माझा परिचय

Wednesday 6 December 2023

वेदविज्ञानरंजन - ७९

 

#वेदविज्ञानरंजन_७९

*प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३*

समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. ह्यातील यंत्रार्णव अध्यायातील खालील श्लोक पाहूया.
🚩
*दंडैश्चक्रैच दंतैश्च सरणिभ्रमणादिभि: |*
शक्तेरूत्पांदनं किं वा चालानं *यंत्रमुच्यते* ॥
🚩

दंड- Lever , चक्र- Pulley, दंत- toothed wheel, सरणि- inclined plane, भ्रमण- Screw ‌
ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता शक्ती निर्माण करण्यासाठी आणि यंत्रे चालविण्यासाठी असते. म्हणजेच, दंड, चक्र, दंत, सरणि, भ्रमण ह्यांच्या मदतीने शक्तीचे उत्पादन होते आणि गती प्राप्त होते.

ह्या यंत्रांची गती कश्या प्रकारे असावी ह्याचे वर्णन पुढील श्लोकात केले आहे :

🚩
*तिर्यगूर्ध्वंमध: पृष्ठे पुरत: पार्श्वयोरपि |*
*गमनं सरणं पात इति भेदा: क्रियोद्भवा:॥*
🚩

(१) तिर्यग्‌- slanting (२) ऊर्ध्व upwards (३) अध:- downwards (४) पृष्ठे- backwards (५) पुरत:-forward (६) पार्श्वयो:- sideways

वरील श्लोकात गतीचे विविध प्रकार वर्णिले आहेत. तिरकी, उर्ध्वगामी, अधोगामी, पुढे जाणारी, मागे जाणारी, बाजूला वळणारी अश्याप्रकारे गतीची दिशा सांगितली आहे. ह्यावरून प्राचीन भारतात भौतिकशास्त्र किती प्रगत होते ह्याची कल्पना येते.

*जलविद्युत निर्माण करण्यासाठी उपयोगात येणारे यंत्र (जनित्र )* ह्याचा उल्लेख भोजराजा ह्याच्या *समरांगण सूत्रधार* ह्या ग्रंथात आहे
🚩
धारा च जलभारश्च पयसो भ्रमणं तथा॥
यथोच्छ्रायो यथाधिक्यं यथा नीरंध्रतापि च।
एवमादीनि भूजस्य जलजानि प्रचक्षते॥
🚩

वाहणाऱ्या, प्रवाहित जलधारेचा उपयोग म्हणजे त्यातील शक्तीचा उपयोग *जलविद्युत* निर्माण करण्यासाठी होतो. ह्या जलधारेच्या वेगामुळे चक्र फिरते. ही जलधारा उंचावरून पडणारी असेल (धबधबा ) तर तिचा वेग अधिक असतो आणि त्यामुळे जनित्र फिरते आणि त्यातून *शक्ती* (विजेची ) निर्मिती होते.

अशाप्रकारचे अतिशय आधुनिक तंत्रज्ञान प्राचीन भारतात अवगत होते.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७८

 

#वेदविज्ञानरंजन_७८

*प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - २*

वाल्मीकी रामायणातील युद्धकांडात रावणाच्या लंकेतील विविध अद्ययावत यंत्रांचा उल्लेख केला आहे.

द्वारेषु तासां चत्वारः सङ्‌क्रमाः परमायताः ।
*यंत्रैरुपेता* बहुभिः महद्‌भिः गृहपंक्तिभिः ॥ १६ ॥

उक्त चारी दरवाजांच्या समोर त्या खदंकावर मचाणांच्या रूपात चार संक्रम ॥*॥ (लाकडाचे पूल) आहेत जे फारच विस्तृत आहेत त्यावर बरीचशी मोठ मोठी यंत्रे लावलेली आहेत आणि त्यांच्या आसपास परकोटावर बनविलेल्या घरांच्या रांगा आहेत. ॥१६॥
(॥*॥- संक्रम : असे कळून येत आहे की संक्रम अशा प्रकारचे पूल होते की ज्यांना जेव्हां आवश्यकता असेल तेव्हा यंत्रांच्या द्वारा खाली पाडले जात असे, म्हणूनच शत्रूची सेना आल्यावर तिला खंदकात पाडण्याची योजना होती.

शत्रुसैन्य पुलावर आले की मोठमोठ्या यंत्रांच्या सहाय्याने तो पूल पाडला जात असे. ह्या पुलाखाली पाण्याने भरलेले प्रचंड मोठे खंदक होते. साहजिकच शत्रुसैन्य खंदकात पडून बुडून जात असे. आता इथे महत्त्वाची गोष्ट अशी की सर्वांत आधी चाल करून येणारे शत्रुसैन्य उभे राहू शकेल इतका *बळकट पूल* निर्माण करायला हवा. म्हणजेच पूल तयार करण्याचे तंत्र अवगत हवे. त्यानंतर असा दणकट पूल पाडण्यासाठी तितकेच *मजबूत यंत्रही हवे.* ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान *त्रेतायुगात अवगत होते* हे निश्चित आश्चर्य वाटणारे आहे.

त्रायन्ते सङ्‌क्रमास्तत्र परसैन्यागते सति ।
*यंत्रै* स्तैरवकीर्यन्ते परिखासु समन्ततः ॥ १७ ॥

जेव्हा शत्रूची सेना येते, तेव्हा यंत्रांच्या द्वारा त्या संक्रमांचे रक्षण केले जाते तसेच त्या यंत्रांच्या द्वाराच त्यांना सर्व बाजूनी खंदकात पाडले जाते आणि तेथे पोहोचलेल्या शत्रूसेनेला सर्व बाजूस फेकून दिले जाते. ॥

परिखाश्च शतघ्न्यश्च *यंत्राणि विविधानि* च ।
शोभयन्ति पुरीं लङ्‌कां रावणस्य दुरात्मनः ॥ २३ ॥

खंदक, शताघ्नि आणि *तर्‍हेतर्‍हेची यंत्रे* दुरात्मा रावणाच्या त्या लंकानगरीची शोभा वाढवीत आहेत. ॥२३॥

वरील श्लोकात पुन्हा एकदा विविध प्रकारच्या यंत्रांचा उल्लेख केला आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७७

 

#वेदविज्ञानरंजन_७७

*प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - १*

वाल्मीकी रामायण बालकांड, सर्ग क्र. ५ मध्ये अयोध्यापुरीच्या संपन्नतेचे वर्णन केले आहे. त्यात अयोधायापुरीत अनेक प्रकारची यंत्रे होती असा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्या संबंधी श्लोक खालीलप्रमाणे आहे.

🚩 कपाटतोरणवतीं सुविभक्तान्तरापणाम् ।
*सर्वयन्त्रायुधवतीमुषितां सर्वशिल्पिभिः ॥ १० ॥* 🚩

अयोध्यापुरी पुरी मोठमोठ्या फाटकांनी आणि तोरणांनी सुशोभित झालेली होती. तिच्यामध्ये पृथक् पृथक् बाजार होते. तेथे *सर्व प्रकारची यंत्रे* आणि अस्त्र शस्त्र संचित केलेली होती. त्या पुरीत सर्व कलांचे शिल्पी निवास करीत होते. ॥ १०

ह्या अयोध्या नगरीत अतिशय संपन्नता होती आणि सर्व कलांचे शिल्पी म्हणजे तंत्रज्ञ, अभियंते निवास करीत होते. ह्याचा अर्थ अभियांत्रिकीच्या विविध शाखा त्रेतायुगात सुद्धा आपल्या भारतात अस्तित्वात होत्या. विविध प्रकारची यंत्रे होती म्हणजे यंत्रशास्त्र अतिशय प्रगत अवस्थेत होते.

वाल्मीकी रामायण युद्धकांड, सर्ग क्र. २० मध्ये खालील श्लोक आहे.
🚩
हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य *यंत्रैः* परिवहन्ति च ॥ ६० ॥🚩

महाकाय महाबलाढ्‍य वानर हत्तींप्रमाणे मोठ मोठ्‍या शिळा आणि पर्वतांना उपटून *यंत्रांच्या द्वारा* (विशिष्ट साधनांच्या द्वारा) समुद्रतटावर घेऊन येत होते.

समुद्र सेतू बांधतानाचे हे वर्णन आहे. महाकाय वृक्ष, प्रचंड मोठ्या शिळा एका ठिकाणाहून दुसरीकडे किंवा समुद्रात आणण्यासाठी मोठ्या मोठ्या *यंत्रांचा उपयोग* होत असे असे प्रस्तुत श्लोकावरून स्पष्ट होते. आता ही यंत्रे म्हणजे जे. सी. बी. किंवा क्रेन सारखी यंत्रे असावीत कारण महाकाय वृक्ष आणि शिलाखंड उचलून समुद्रतटावर आणण्यासाठी तितकीच *मजबूत यंत्रे* हवीत.

वाल्मीकी रामायण, युद्धकांड सर्ग ४ मध्ये खालील श्लोक आहे.
🚩
*तत्रेषूपलयन्त्राणि बलवन्ति महान्ति च ।*
*आगतं परसैन्यं तु तैः तत्र प्रतिनिवार्यते ॥ १२ ॥*🚩

त्या दरवाजांवर मोठी विशाल आणि *प्रबळ यंत्रे* लावलेली आहेत, जी तीर आणि दगडांच्या गोळ्यांची वृष्टि करतात. त्यांच्या द्वारा आक्रमण करणार्‍या शत्रुसैन्याला पुढे येण्यापासून अडविले जाते.

समुद्रावरील सेतू पार करून सर्व वानरसेनेसहित प्रभू श्रीरामचंद्र लंकेत प्रवेश करतात. त्यावेळी हनुमान लंकेच्या युद्धसज्जतेचे वर्णन करतात. *लंकेच्या प्रवेशद्वारावर प्रचंड मोठी यंत्रे लावली आहेत* जी दगडांचा वर्षाव करतात. आता गोळ्यांचा वर्षाव करणारी यंत्रे म्हणजे तोफा किंवा तत्सम यंत्रे. आजच्या भाषेत आपण AK 47 ह्या बंदूकीतून बर्‍याच गोळ्या मारू शकतो. अशाप्रकारची यंत्रे रावणाकडे होती. आता अशाप्रकारची यंत्रे तयार करण्यासाठी आवश्यक ज्ञान नक्कीच रावणाकडे असणार.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७६

 

#वेदविज्ञानरंजन_७६

*रसायनशास्त्र विषयात आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हा लेख जरूर पाठवावा ही नम्र विनंती.*

*प्राचीन भारतीय रसायनशास्त्र भाग - २*

आजच्या भागात आपण प्राचीन भारतीय
रसायनशास्त्राची माहिती घेणार आहोत.

🚩 *तीर्यक्पतन यंत्र* 🚩

🚩
क्षिपेद्रसं घटे दीर्घे नताधोनालसंयुते |
तन्नालं निक्षिपेदन्यघटकुक्ष्यन्तरे खलु ||
तत्र रुद्ध्वा मृदा सम्यग्वदने घटयेरथः |
अधस्ताद्रसकुम्बस्य ज्वालयेत्तीव्रपावकम् ||
इतरस्मिन्घटे तोयं प्रक्षिपेत्स्वादुशीतलम् |
तिर्यक्पातनमेथद्धि वार्तिकैरभिधीयते ||
🚩

*क्षिपेद्रसं घटे दीर्घे नताधोनालसंयुते |*

एक रसायन (ज्यातील घटक वेगळे करायचे आहेत असे रसायन) एका घटात (मळ्यात, भांड्यात ) ठेवा. त्या घटाला एक *अधोमुखी नळी* बसवा (जी जमिनीच्या दिशेने झुकलेली आहे )

*तन्नालं निक्षिपेदन्यघटकुक्ष्यन्तरे खलु ||*

*त्या नळीचे दुसरे टोक खाली जमिनीवर ठेवलेल्या एका घटाला जोडा.*

*तत्र रुद्ध्वा मृदा सम्यग्वदने घटयेरथः |*

*ती नळी आणि दोन घट यांचे जोड मातीने आणि कापडाने घट्ट बांधा*.

*अधस्ताद्रसकुम्बस्य ज्वालयेत्तीव्रपावकम् ||*

*ज्या घटात रसायन ठेवले आहे त्या घटाखाली अग्नी प्रज्वलित करा.*

*दुसरा घट जो जमिनीवर ठेवला आहे (ज्याला अधोमुखी नळी जोडली आहे ) त्यावर थंड पाणी टाका.*

*तिर्यक्पातनमेथद्धि वार्तिकैरभिधीयते ||*

ह्या यंत्राला *तिर्रक्पतन यंत्र* असे म्हणतात आणि त्याचा उपयोग *ऊध्वपतन पद्धतीने (distillation ) रसायनातील घटक वेगळे करण्यासाठी होतो.*

ज्यांच्या तापमानामध्ये बरेच अंतर असते अशाच घटकांचे ऊर्ध्वपातन करून त्यांना वेगळे करता येते. या पद्धतीने गुलाबाच्या फुलातील सुगंधी द्रव्य मिळविता येते, मद्यार्क (अल्कोहॉले) तयार करता येतात, सांडपाण्यापासून शुद्ध पाणी मिळवता येते व खनिज तेलापासून पेट्रोल मिळवता येते. औद्योगिक क्षेत्रात ही प्रक्रिया अनेक ठिकाणी उपयोगी पडते. लहान प्रमाणात करावयाचे ऊर्ध्वपातन गट पद्धतीने करतात.

यामध्ये एखाद्या हंड्यासारख्या भांड्यात, पाण्यात कालविलेले घन पदार्थाचे घटक भरतात व ते भांडे शेगडीवर ठेवून मंद आगीने तापवतात. भांड्यातील पाणी तापून वाफ उत्पन्न होते व पाण्यात कालविलेल्या घटकांतील सहज *बाष्पनशील* (बाष्प होऊन उडून जाणारे) घटक बाहेर पडून वाफेत मिसळतात. ही वाफ भांड्याच्या तोंडावर बसवलेल्या नळीवाटे एका *संघनकात* (वाफ थंड करण्यासाठी वापरलेल्या भांड्यात) जाते. तेथे थंड पाण्याने वाफ थंड होऊन द्रवरूप होते व संघनकाच्या खाली बसवलेल्या टाकीत साठते. भांड्यामध्ये सुगंधी द्रव्ये असल्यास ती बाष्परूपाने वाफेबरोबर बाहेर जातात व पुन्हा द्रवरूप घेऊन ऊर्ध्वपातित पाण्यावर तरंगतात. *तेलासारखी हलकी द्रव्ये पाण्यातून सहज वेगळी काढता येतात.*

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७५

 

#वेदविज्ञानरंजन_७५

*रसायनशास्त्र विषयात आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हा लेख जरूर पाठवावा ही नम्र विनंती.*

*प्राचीन भारतीय रसायनशास्त्र भाग - १*

आजच्या भागात आपण प्राचीन भारतीय
रसायनशास्त्राची माहिती घेणार आहोत.

वाग्भट ह्यांनी लिहिलेल्या *रसरत्नसमुच्चय* ह्या ग्रंथात रसशाळा (Chemistry Lab )  ह्याचे छान वर्णन केले आहे.

🚩
रसशालां प्रकुर्वीत सर्वबाधाविवर्जिते
सर्वोषधिमये देशे रम्ये कूपसमन्विते ||१||
🚩

रसशाळा म्हणजे प्रयोगशाळा अश्या ठिकाणी असावी की जी बाहेरील गोंधळापासून मुक्त असेल. प्रयोगशाळेभोवती *विविध औषधी वनस्पती* असलेला प्रदेश असावा आणि *मुबलक प्रमाणात पाणी* असावे.
🚩
यक्षत्र्यक्षरसहस्राक्षदिग्विभागसुशोभने
नानोपकरणोपेतां प्रकारेण सुशोभिताम् ||२||
🚩

प्रयोगशाळेच्या भोवती उंच कुंपण ( भिंत असावी ) प्रयोगशाळेत *विविध प्रकारची उपकरणे* असावीत
🚩
शालायाः पूर्वदिग्विभागे स्थापयेद्रसभैरवम् |
वह्निकर्माणि चाग्नेये याम्ये पाषाणकर्म च ||३ ||
🚩

*रसभैरव* म्हणजे प्रयोगशाळेची देवता *पूर्व दिशेला* स्थापन करावी. *प्रयोगशाळेतील भट्टी* किंवा अग्नीचे स्थान *आग्नेय दिशेस* आणि *दगडांचे साहित्य दक्षिणेस* ठेवावे.

🚩
नैऋत्ये शस्त्रकर्माणि वारुणो क्षालनादिकम् |
शोषणं वायुकोणे च वेधकर्मोत्तरे तथा ||४ ||
🚩

कापण्यासाठी उपयोगात असणार्‍या सुऱ्या किंवा इतर *शस्त्रे नैऋत्य दिशेस* असावीत आणि *पश्चिम दिशेस धुण्याची आणि साफसफाईची जागा* असावी. *ईशान्य दिशेकडे प्रयोगशाळेतील साहित्य वाळवावे.*

🚩
स्थापनं सिद्धवस्तूनां प्रकुर्यादीशकोणके |
पदार्थसंङ्ग्रहः कार्यो रससाधनहेतुकः ||५ ||
🚩

*धातुकाम उत्तर दिशेकडे* करावे आणि प्रयोगशाळेत तयार झालेली द्रव्ये ईशान्य दिशेकडे साठवावीत.

अशाप्रकारे, प्रयोगशाळेची रचना कशी असावी ह्याचे वर्णन आपल्याला वरील श्लोकांत दिसून येते.

रसार्णव ह्या ग्रंथात धातूंचे गुणधर्म सांगितले आहेत.
ते खालीलप्रमाणे आहेत.
🚩
सुवर्णं रजतं ताम्रं तीक्ष्णं वङ्गं भुजङ्ममम् |
लोहन्तु षड्विधं तच्च  यथापूर्वम् तदक्षयम् ||
🚩

Gold, silver, copper, iron, lead, zinc are the 6 types of metals, their stability (resistance towards corossion / reactivity ) is in the reverse order of the above.

सोने, चांदी, तांबे, लोह, शिसे आणि जस्त असे धातूंचे काही प्रकार सांगितले आहेत.

रसरत्नसमुच्चय ह्या ग्रंथात ६ प्रकारचे लवण (Sault) सांगितले आहे. ते खालीलप्रमाणे :

🚩
लवणानि षडुच्यन्ते सामुद्रं सैन्धवं बिडम् |
सौर्वचलं रोमकञ्च चूल्लिकालवणं तथा ||
🚩

अशाप्रकारे प्राचीन भारतात रसायनशास्त्र अतिशय प्रगत अवस्थेत होते ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७४

 

#वेदविज्ञानरंजन_७४

आजच्या लेखात आपण प्राचीन भारतीय संस्कृतीमधील नौकाबांधणी आणि नौकानयन ह्याची माहिती घेऊ.

*नौकाबांधणी, नौकासंचालन*

ऋग्वेद मंडल १ सूक्त २५ मंत्र ७

🚩
वेदा यो वीनां पदमन्तरिक्षेण पतताम् |
वेद नावः समुद्रियः ||७||
🚩
*आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचा मार्ग जे जाणतात ते समुद्रात संचार करणार्‍या नौकांचे मार्ग सुद्धा जाणतात.*

ह्याचा अर्थ *पक्ष्यांच्या उडण्याच्या दिशांचा अभ्यास* ऋग्वेदातील ऋषींनी केला असला पाहिजे. त्या दिशांवरुन आपली *नौका समुद्रात कोणत्या दिशेने न्यावी ह्याची माहीती* त्यांना निश्चित होती. आता नौका समुद्रातून चालवायची म्हणजे * समुद्राच्या लाटांवर स्वार होणारी तितकीच भरभक्कम नौका* हवी. वेदकाळात ह्याचे तंत्र अवगत होते.

ऋग्वेद मंडल १ सूक्त ९७ मंत्र ८
🚩
स नः सिन्धुमिव नावयाति पर्षा स्वस्तये |
अप नः शोशुचदघम् ||८||
🚩
(नावया सिन्धुं इव ) म्हणजे नौकेने समुद्र किंवा नदी पार करणे शक्य आहे असे म्हटले आहे. आता नदी पार करण्यासाठी छोटी होडी, गलबत ह्याचा उपयोग होतो. पण मोठा समुद्र पार करण्यासाठी प्रचंड मोठ्या जहाजाची आवश्यकता आहे. समुद्रप्रवास हा *भारतीयांना निषिद्ध नाही.* समुद्र प्रवास करणे वाईट आहे असे वेदांनी अजिबात सांगितलेले नाही. आपल्याला फक्त कोलंबस ह्याचा सागरी प्रवास इतिहासात शिकविला जातो. परंतु, त्याच्याही कितीतरी हजार वर्षे आधी भारतीय मोठ्या मोठ्या जहाजातून समुद्र प्रवास करीत असत.

शंभर वल्ह्यांची नाव

ऋग्वेद मंडल १ सूक्त ११६ मंत्र ५

🚩शतारित्रां नावमातस्थिवांसम् ||५ ||🚩

ह्यात अश्विनी कुमारांना प्रार्थना केली आहे की अथांग समुद्रात *शंभर वल्ह्यांनी चालणारी नाव* असून त्यावर चढलेल्या भुज्यूला तुम्ही घरी पोहोचवलेत.

महाभारत आदिपर्वात *यंत्राद्वारे* चालणाऱ्या नावेचे उल्लेख आहेत.

🚩सर्ववातसहां नावं *यंत्रयुक्तां* पताकिनीम्। 🚩

सर्व प्रकारची वादळे सहन करणारी, मोठमोठी निशाणे असलेली आणि *यंत्रांनी युक्त* अशी नाव आहे. महाभारत हे द्वापारयुगात घडले त्याचा काळ साधारण इ. पू. ५५०० वर्षे इतका मागे जातो. त्याकाळी सुद्धा *यंत्रविज्ञान खूप प्रगत* होते आणि *पाश्चात्य देशात ह्याची माहितीही नव्हती* हे अधोरेखित करणे आवश्यक आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७३

 

#वेदविज्ञानरंजन_७३

*वेदांतील स्थापत्यशास्त्र - भाग - २* 🌺
🚩
ब्रह्मणा शालां निमितां कविभिर्निमिता मिताम् |
इन्द्राग्नी रक्षतां शालाममृतौ सोम्यं सदः ||१९ ||
🚩

(ब्रह्मणा निमितां शालां ) ज्ञानी माणसाने निर्माण केलेल्या शाळेचे (घराचे ) आणि कवींनी दिलेल्या प्रमाणात बांधलेल्या शाळेचे रक्षण इंद्र आणि अग्नी यांनी करावे.

येथे *ब्रह्मा म्हणजे ज्ञानी* माणसाने निर्माण केलेले घर असा उल्लेख आहे. ज्ञानी माणूस म्हणजे कोण? घर निर्माण करण्याचे *ज्ञान असलेला आर्किटेक्ट,* विद्वान. कवींनी दिलेल्या प्रमाणात म्हणजे योग्य *नकाशाच्या आधारे मोजमाप* घेऊन उत्तम कारागिरांच्या मदतीने घर बांधावे.
🚩
कुलाले$धि कुलायं कोशे कोशः समुब्जितः |
तत्र मर्तो विजायते यस्माद् विश्वं प्रजायते ||२० ||
🚩
दुसरा मजला बांधायचा असेल तर एकाच्या वर एक अशाप्रकारे बांधावा. जसे (  कुलाये अधि कुलायं ) म्हणजे एकावर एक असे घरटे बांधतात, (कोशे कोशः ) एका कोशावर एक कोश ठेवतात अशाप्रकारे *बहुमजली घर* बांधावे. अशा उत्तम घरात मनुष्याचा जन्म होवो. पक्षीसुद्धा प्रसूतीच्या आधी उत्तम घरटे तयार करतात ते पाहून मनुष्याने सुद्धा आपल्या घरातील एका ठिकाणी *प्रसूतीचे स्थान* तयार करावे. म्हणजे बाळंतिणीची खोली असावी.
🚩
या द्विपक्षा चतुष्पक्षा षट् पक्षा या निमीयते |
अष्टपक्षां दशपक्षां शालां मानस्य पत्नीमग्निर्गर्भ इवा शये ||२१ ||
🚩

दोन खोल्यांचे, चार, सहा, आठ, दहा खोल्यांचे घर बांधावे. (मानस्य पत्नीं शालां) इथे खूप महत्त्वाचा अर्थ आहे. गृहनिर्माण करण्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीला *वास्तुरचनाकार म्हणजेच मानपती* असे नाव होते. त्याने दिलेल्या प्रमाणानुसार तयार केलेली *शाळा (घर ) म्हणजेच मानपत्नी* होय. मानपत्नी ह्याचा अर्थ घर (शाळा ) असा आहे. घरातील माणसांच्या संख्येवर खोल्यांची आणि मजल्यांची संख्या ठरविणे आवश्यक आहे. अशा *घराच्या गर्भात अग्नी* असावा. बाहेर असलेल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी तसेच स्वयंपाक करण्यासाठी घरात अग्नी आणि शुद्ध पाणी असणे आवश्यक आहे.
🚩
हविर्धानमग्निशालं पत्नीनां सदनं सदः |
सदो देवानामसि देवि साले ||७||
🚩

हे (शाले देवि ) गृहरूपी देवते! (हविर्धानं) हवन करण्याचे स्थान, (अग्निशालं) *अग्नीशाला* म्हणजे स्वयंपाकघर जिथे चूल पेटलेली असते,(पत्नीनां सदनं ) *स्त्रियांचे राहण्याचे ठिकाण* (खोली ) (सदः ) राहण्याचे ठिकाण (living room ) (देवानां सदः ) देवांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे *देवघर* असावे. ह्याचा अजून एक अर्थ असा की अतिथी देवो भव | अशी आपली शिकवण आहे ह्या अतिथीरूपी देवाचे राहण्याचे ठिकाण ( Guest Room ) असावी. घराची रचना अशाप्रकारे असावी ह्याचे संपूर्ण वर्णन केले आहे. ह्यावरून वेदकाळात गृहनिर्माण आणि स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते हे लक्षात येते.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*
जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...