माझा परिचय

Showing posts with label गुरुत्वाकर्षण. Show all posts
Showing posts with label गुरुत्वाकर्षण. Show all posts

Monday, 12 December 2022

वेदविज्ञानरंजन - २

 वेदविज्ञानरंजन_२

गुरुत्वाकर्षण सिद्धांत


गुरुत्वाकर्षण सिद्धांत दर्शविणारी ऋग्वेदातील खालील ऋचा पाहू : ऋग्वेद मंडल ८ सूत्र १२ मंत्र २८ 


यदा ते हर्य्यता हरी वावृधाते दिवेदिवे |

आदित्ते विश्वा भुवनानि येमिरे ||


ह्याचा अर्थ खालील प्रमाणे :


जेव्हा (यदा ते ) ते सर्व ग्रह (विश्वा भुवनानि ) कालपरत्वे (दिवेदिवे ) गतिमान होऊन (हर्य्यता हरी ) सूर्याच्या निकट असतात , तेव्हा त्यांच्या गतीत वाढ होते ( वावृधाते ) तेव्हा (आदित्ते ) त्यावेळी ते ग्रह सूर्याकडून आपापल्या कक्षेत आणि स्थानात स्थापन केले जातात. 


ह्यातून खालील चार वैज्ञानिक तत्त्वांचा बोध होतो. 


१. सूर्य आणि ग्रह यांच्या मध्ये गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे. 

There is a gravitational force in between planets and the Sun


२. ग्रहांची कक्षा स्थिर असते 

Planets are moving in an orbit. 


 ३. सूर्य स्थिर असून इतर ग्रह त्याभोवती फिरतात*. 

The Sun is steady and planets are revolving around it


४. ग्रहांची परिभ्रमण गती आणि त्यांचे सूर्यापासूनचे अंतर ह्यांचे प्रमाण व्यस्त असते. 


The motion of planet is such that 

Velocity of planets is in inverse relation with the distance in between the plane and the Sun


वरील सूत्रात गुरुत्वाकर्षण सिद्धांत आणि सूर्य स्थिर असून सर्व ग्रह त्याभोवती फिरतात असे सांगितले आहे. येथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणारे ग्रह ह्यांचे ज्ञान ऋग्वेदकालीन ऋषींना कसे होते? एकतर सूक्ष्म शरीर धारण करून योगबळाने पृथ्वीच्या बाहेर अवकाशात जाऊन त्यांनी हे सर्व पाहिले असावे किंवा त्याकाळी अवकाशयाने अस्तित्वात असणार ज्याच्यामध्ये अवकाशप्रवास करून सर्व निरीक्षणे नोंदवली असण्याची शक्यता आहे. वेदकालीन अवकाशयाने हा माझा एक स्वतंत्र लेख ह्या लेखमालिकेत पुढे येईलच. 


पिप्पलाद ऋषींनी प्रश्नोपनिषद ह्या ग्रंथात गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला आहे. 


 पायूपस्थे अपानम् (प्रश्नोपनिषद ३.४) 

पृथिव्यां या देवता सैषा पुरुषस्यापानमवष्टभ्य (प्रश्नोपनिषद ३.८ ) 

तसेच आद्य शंकराचार्य ह्यांनी प्रश्नोपनिषद यांवर जे शांकरभाष्य लिहिले आहे त्यात ते म्हणतात 

तथा पृथिव्यां अभिमानिनी या देवता सैषा पुरुषस्य अपानवृत्तीं आकृष्य अपकर्षेण अनुग्रहं कुर्वती वर्तते |

अन्यथा हि शरीरं गुरुत्वात् पतेत् सावकाशे वा उद्गच्छेत् |


ह्याचा अर्थ असा की अपान वायूमुळे मलमूत्र शरीरातून बाहेर पडते. पृथ्वी आपल्या आकर्षण शक्तीमुळे सर्वांना धरून ठेवते. नाहीतर सर्व आकाशात उडून जातील. 

 

Earth is having its own force of attraction dute to which objects are being hold on the surface of the earth. Otherwise object will be fly in the sky


वराहमिहीर यांनी आपल्या पंचसिद्धांतिका ग्रंथात गुरुत्वाकर्षण सिद्धांताचा उल्लेख केला आहे. 


पंचमहामूतमयस्तारागण पंजरे महीगोलः|

खेयस्कान्तान्तःस्थो लोह इवावस्थितो वृत्त: ||


ह्याचा मराठी भाषेत अर्थ पुढीलप्रमाणे 


ज्याप्रमाणे दोन लोहचुंबकांमध्ये लोखंड तुकडा ठेवला असता तो अधांतरी राहतो त्याप्रमाणे तारासमूहात पृथ्वीगोल विशिष्ट शक्तीमुळे (गुरुत्वाकर्षण शक्ती ) अधांतरी राहतो वराहमिहीर यांनी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि त्याचबरोबर चुंबकत्वसुद्धा स्पष्ट केले आहे. म्हणजेच त्याकाळी चुंबकत्वाचे (Magnetizum ) सुद्धा ज्ञान अवगत होते. तसेच महीगोलः असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणतच पृथ्वी गोल आहे हेही त्या काळी ज्ञात होते. 


When an iron piece is hold in between two magnets then it it Wil be balanced by the magnetic force by the two magnets. In the same way the earth is balanced by gravitational force in the space


महर्षी पतंजली यांनी त्यांच्या व्याकरणमहाभाष्य ह्या ग्रंथात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आहे. 


 लोष्ठः क्षिप्तो बाहुवेगं गत्वा नैव तिर्यक् गच्छति नोर्ध्वमारोहति | पृथिवीविकारः पृथिवीमेव गच्छति आन्तर्यतः |



जर मातीचे ढेकूळ (लोष्ठः ) (माती असलेला घट्ट तुकडा ) आकाशाच्या दिशेने वर फेकला तर तो तुकडा त्याचा वेग पूर्ण झाल्यावर क्षणभर थांबतो, आणखी वर जात नाही (नोर्ध्वमारोहति ) . ह्याचे कारण असे की पृथ्वीचा विकार (पृथिवीविकारः) (गुरुत्वाकर्षण शक्ती ) मुळे तो तुकडा पुन्हा खाली येऊन पृथ्वीवर पडतो (पृथिवीमेव गच्छति)


When a piece of soil is thrown in the sky then after some time it's velocity decreases. It becomes steady for a while and then falls on earth due to the gravitational force of Earth


महाभारतातील शांतिपर्वात अध्याय क्र. २६१ मध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांचा संवाद आहे त्यातील श्लोक क्रमांक ३ मध्ये भीष्म पितामह म्हणतात :


भूमेः स्थैर्यं गुरुत्वं च काठिन्यं प्रसवात्मता |

गन्धोः भारश्च शक्तिश्च संघातः स्थापना धृतिः ||


ह्याचा अर्थ पुढीलप्रमाणे 

हे युधिष्ठिरा! स्थिरता, गुरुत्वाकर्षण, कठोरता, उत्पादकता, गंध, भार, शक्ती, घट्टपणा , स्थापना हे भूमीचे गुण आहेत.


वरील श्लोकातील भूमीचा दुसरा गुण गुरुत्व म्हणजेच गुरुत्वाकर्षण आहे असे स्वतः भीष्म सांगत आहेत. 


ह्या आधीच्या लेखातील आणि प्रस्तुत लेखातील विविध उदाहरणांचा विचार करता असे लक्षात येते की न्यूटनच्या कितीतरी शतके आधीच वेद, उपनिषदे यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आहे. परंतु त्यांचा कुठेच उल्लेख नाही. सर्व श्रेय मात्र न्यूटनलाच दिले गेले, कारण त्याने गुरुत्वाकर्षणाचे सूत्र मांडले

परंतु गुरुत्वाकर्षणाची मूळ संकल्पना मात्र युरोपीय नसून भारतीयच आहे आणि ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

आपल्या भारत देशाचे, शिक्षण अभ्यासक्रमाचे (मेकॉले प्रणीत शिक्षणपद्धती) हे दुर्दैव आहे की जाणीवपूर्वक वेदांतील विज्ञान नजरेआड केले गेले. माझी शालेय शैक्षणिक विभागाला विनंती आहे की गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे श्रेय न्यूटनला जरी दिले गेले असले तरीही शालेय विज्ञान पुस्तकात वर उल्लेख केलेल्या वेद, उपनिषदे यांतील गुरुत्वाकर्षण सूत्राचा सुद्धा उल्लेख करावा. म्हणजेच आपल्या पूर्वजांचे, वेदांचे ज्ञान किती सखोल होते हे सर्वांना समजेल आणि त्याचा प्रसार होईल. तूर्तास इथेच थांबतो. 

                    🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

Thursday, 8 December 2022

वेदविज्ञानरंजन - १

 वेदविज्ञानरंजन - १



सर्वप्रथम आपण आज गुरुत्वाकर्षण बल, त्याचा प्राचीन ऋषींनी मांडलेला सिद्धांत पाहणार आहोत. 

परमाणूची संकल्पना मांडणारे महर्षी कणाद (अंदाजे इ. स. पू. ४थे किंवा ५ वे शतक ) यांनी त्यांच्या वैशेषिक सूत्रांत  गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला आहे.  

संयोगाभावे गुरूत्वात् पतनम्  असे अतिशय सोपे सूत्र म्हणजेच गुरुत्वाकर्षण सिद्धांत होय. 

आता त्याचा अर्थ सोप्या भाषेत पाहू. 

संयोगाभावे म्हणजे एखाद्या वस्तूवर जर संयोगाचा म्हणजेच बलाचा अभाव असेल तर ती वस्तू गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे (गुरूत्वात् ) खाली पडते (पतनम् ) 

In the absence of SANYOG (contact with external forces ) an object falls  due to GURUTVA (Mass) अतिशय सुंदर आणि सूत्रबद्ध रीतीने महर्षी कणाद यांनी हे सूत्र मांडले आहे. अजून एका ऋग्वेदातील ऋचेत गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला आहे. 

 अजः न क्षाम् दाधार पृथिवीम् तस्तम्भ द्याम् मंत्रेभिः सत्यैः  

ह्याचा अर्थ खालीलप्रमाणे 

The unborn force of field (अजः) , keeps us (नाह ) rooted to the earth (क्षाम् ). The same ever resent force (तत् ) or field holds (स्तम्भ ) the earth (पृथिवीम् ) in space (द्याम् ) असे काहीतरी बल आहे की जे आपल्याला पृथ्वीवर धरून ठेवते आणि तशाच प्रकारचे बल पृथ्वीला अवकाशात धरून ठेवते. ह्यातून पृथ्वीची स्वतःची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीला अवकाशात धरून ठेवणारी सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती दोहोंचा अर्थबोध होतो. 

वराहमिहिर ( अंदाजे इ. स. पू. ६ वे शतक ) यांच्या पंचसिद्धांतीका ह्या ग्रंथात त्यांनी गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला आहे. 

गगनम् उपैति शिखिशिखा क्षिप्तम् अपि 

क्षितिम् उपैति गुरू किञ्चित् वद्वदिह 

मानवानामसुराताम् तद्वदेवाधः 

ह्याचा अर्थ खालीलप्रमाणे 

Any heavy object (गुरू ) of thrown above towards the sky falls back to the ground

वस्तुमान असलेली वस्तू आकाशाच्या दिशेने फेकली असता ती जमिनीवर येऊन पडते 

GRAVITY ह्या शब्दाची व्युत्पत्ती लॅटिन शब्द GRAVIS पासून झाली असून मूळ संस्कृत शब्द GURU (Heaviness, Mass fullness ) असा आहे

थोर गणिती भास्कराचार्य (द्वितीय ) कार्यकाळ अंदाजे इ. स. १११४ ते इ. स. ११८५ ह्यांनी सुद्धा न्यूटनच्या आधी सुमारे ५०० वर्षे सिद्धांत शिरोमणी ह्या ग्रंथात गुरूत्वाकर्षण सिद्धांत मांडला आहे. सिद्धांत शिरोमणी - गोलाध्याय - भुवनकोश ह्यातील गुरुत्वाकर्षण सिद्धांत खालीलप्रमाणे :

 मरुच्लो भूरचला स्वभावतो यतो विचित्रावतवस्तु शक्त्यः |

आकृष्टीशक्तिश्च मही तथा यत् खस्थं गुरुस्वाभिमुखं स्वशक्तया |

आकृष्यते तत्पतीतेव भाति समेसमन्तात् क्व पतत्वियं खे | 

 ह्याचा अर्थ पुढीलप्रमाणे :

पृथ्वीमध्ये आकर्षण शक्ति आहे. पृथ्वी आपल्या आकर्षण शक्तीने पदार्थांना, वस्तूंना आपल्याकडे खेचते आणि आकर्षणामुळे ते जमिनीवर पडतात. अवकाशात मात्र विविध ग्रहांची गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांचे संतुलन राखते आणि समान शक्ति सर्व बाजूंनी असल्यामुळे सर्व ग्रह अवकाशात तरंगतात. 

The earth has its own gravitational force due to which an object gets attracted towards the earth and falls on it. But in the space the gravitational force of different planes balances each other and these forces are applied by all sides. Due to which planets can move in the space. 

आता अंदाजे सन १६७८ मध्ये न्यूटन यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षण नियम पाहू :

Every particle  attracts every other particle in the universe with a force which is directly proportional to the production of their masses and inversely proportional to the square of the distance between their centers

आता असे आहे की गुरुत्वाकर्षण नियम प्रस्थापित करण्याचे श्रेय न्यूटनकडे जाते. न्यूटन यांनी सिद्धांत विषद करून सांगितला आणि त्याचे सूत्र (Formula ) सुद्धा सिद्ध केला. ह्याबद्दल काहीच दुमत नाही. परंतु, त्यांच्या आधी कितीतरी शतके भारतीय वेद, उपनिषदे ह्यांत सुद्धा हाच सिद्धांत आपल्या प्राचीन ऋषींनी, वैज्ञानिकांनी सुद्धा केला आहे. परंतु, त्यांचा उल्लेख कुठेही नाही असे का? आता शाळांमधील शिक्षकांनाच प्राचीन भारतीय वेद, उपनिषदे आणि त्यांनी मांडलेल्या सिद्धांताविषयी काही माहिती नाही. तर ते शिक्षक मुलांना काय सांगणार? न्यूटन झाडाखाली बसला होता. वरून सफरचंद खाली पडले आणि त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला ही गोष्ट शाळांमध्ये अगदी रंगवून सांगितली जाते. पण आपल्या वेदांमधील ह्याच सिद्धांतावर काहीही भाष्य केले जात नाही*. हीच आपली शोकांतिका आहे आपल्या भारत देशाचे, शिक्षण अभ्यासक्रमाचे (मेकॉले प्रणीत शिक्षणपद्धती) हे दुर्दैव आहे की जाणीवपूर्वक वेदांतील विज्ञान नजरेआड केले गेले. माझी शालेय शैक्षणिक विभागाला विनंती आहे की गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे श्रेय न्यूटनला जरी दिले गेले असले तरीही शालेय विज्ञान पुस्तकात  वर उल्लेख केलेल्या वेद, उपनिषदे यांतील गुरुत्वाकर्षण सूत्राचा सुद्धा उल्लेख करावा. म्हणजेच आपल्या पूर्वजांचे, वेदांचे ज्ञान किती सखोल होते हे सर्वांना समजेल आणि त्याचा प्रसार होईल. अजून बरेच दाखले द्यायचे आहेत. परंतु ते पुढील लेखात देईन. तूर्तास इथेच थांबतो. 

          🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

टीप : येथे न्यूटन यांना कुठेही कमी लेखायचा हेतू नसून वेद, उपनिषदे ह्यांनी न्यूटनच्या कितीतरी शतके आधीच गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला होता हे ठसवायचे आहे.

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...