माझा परिचय

Showing posts with label न्यूटन. Show all posts
Showing posts with label न्यूटन. Show all posts

Saturday, 24 December 2022

वेदविज्ञानरंजन - २९ : न्यूटनचे गतिविषयीचे नियम भाग - २

 वेदविज्ञानरंजन - २९ :  न्यूटनचे गतिविषयीचे नियम भाग - २

आजच्या लेखात आपण न्यूटनचा गतिविषयीचा पहिला नियम (Newton's law of motion ) पाहिला होता. आज आपण अजून दोन नियम पहाणार आहोत. आपल्या सर्वांना शाळेत असताना हे तीन नियम शिकवलेले असतात, ते विज्ञानाच्या पुस्तकात. हेच नियम महर्षी कणाद यांनी त्यांच्या वैशेषिक ग्रंथात नमूद केले आहेत. याचे विवेचन आपण पाहू. 

न्यूटनचा गतिविषयीचा दुसरा नियम

(Newton's second law of motion ) 

The rate of change of motion of the body is directly proportional to the force applied. 

वस्तूच्या गतीत होणारा बदल, वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलाच्या समानुपाती असतो. 

वेगः निमित्तापेक्षात कर्मणो जायते नियतदिक क्रियाप्रबन्धहेतु

(Change of motion is proportional to the motive force impressed and is made in the direction of the right line in which the force is impressed)

एखाद्या वस्तूवर जेव्हढे अधिक बल (force) लावले जाते तेव्हढी त्या वस्तूची गती (velocity ) अधिक वाढते, अधिक त्वरण (acceleration ) निर्माण होते 

प्रयत्नविशेषान्नोदनविशेषः    वैशेषिक ५.१.६ 

Particular efforts results in particular impulse. 

न्यूटनचा गतिविषयीचा तिसरा नियम

Every action has equal and opposite reaction 

कार्यविरोधि कर्मः. वैशेषिक ५.१.६ 

वेगः संयोगविशेषविरोधी 

(Every action there is always an equal and opposite reaction)

The Effect (KARYA ) always opposes the Action (KARMA)

नदीच्या किनाऱ्यावर आपल्याला एखादी होडी पाण्यात ढकलायची असेल तर किनाऱ्यावरील जमिनीच्या दिशेने बल लावावे लागते तेव्हा त्याच्या विरुद्ध दिशेने होडी पाण्यात ढकलली जाते.न्यूटन यांनी सांगितलेले हे तीन नियम आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात कमी अधिक प्रमाणात वापरत असतो.

आज आपण जे न्यूटनचे गतिविषयीचे नियम वाचतो ते मुळात महर्षी कणाद यांचे आहेत. महर्षी कणाद यांचा काळ अंदाजे इ. स. पू. ६ वे ते २ रे शतक असा आहे आणि न्यूटन यांचा काळ इ. स. १६४३ ते इ. स.१७२७ असा आहे. ह्याचा अर्थ न्यूटनच्या आधीच साधारण १००० वर्षे महर्षी कणाद यांनी गतिविषयीचे नियम त्यांच्या ग्रंथात मांडले आहेत आणि त्याचे दस्तऐवजीकरणसुद्धा (Documentation ) केले आहे. हे सर्व समोर दिसत असून सुद्धा सर्व श्रेय महर्षी कणाद यांना देण्याच्या ऐवजी न्यूटन यांना दिले गेले. वैदिक संस्कृती ही अतिशय प्राचीन संस्कृती असून हिंदू धर्म हा वैज्ञानिक धर्म आहे. परंतु, पाश्चिमात्य विद्वानांनी जाणीवपूर्वक भारतीयांचे खच्चीकरण करून आपल्याला मागास ठरवले. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही आपल्या वैज्ञानिक ऋषींची उपेक्षा का? भौतिकशास्त्र शिकविणाऱ्या भारतातील एकाही संस्थेला दाखल घ्यावी असे वाटले नाही का? 

माझी भारत सरकारला आणि मराठी विज्ञान परिषद अशा संस्थांना हात जोडून विनंती आहे की ह्यासंदर्भात योग्य तो पाठपुरावा करून प्राचीन भारतीय ऋषींच्या कार्याला, त्यांच्या वैज्ञानिक शोधांना प्रतिष्ठा मिळवून द्यावी.

खालील चित्रांत महर्षी कणाद यांचे गतिविषयीचे नियम दर्शविले आहेत. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - २८ : न्यूटनचे गतिविषयीचे नियम भाग - १

 वेदविज्ञानरंजन - २८ : न्यूटनचे गतिविषयीचे नियम भाग - १

आजच्या लेखात आपण न्यूटनचे गतिविषयीचे नियम (Newton's law of motion ) पाहणार आहोत. आपल्या सर्वांना शाळेत असताना हे तीन नियम शिकवलेले असतात ते विज्ञानाच्या पुस्तकात. हेच नियम महर्षी कणाद यांनी त्यांच्या वैशेषिक ग्रंथात नमूद केले आहेत. याचे विवेचन आपण पाहू. 

न्यूटनचा पहिला नियम : (Newton's first law of motion ) 

The change of motion is due to impressed force (Principia)

An object at rest will stay at rest and an object in motion will stay in motion unless acted by  the net external force. 

ह्या नियमाचे मराठी भाषांतर पाहू :

एखादी वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहते, गतीमान असेल तर गतिमान राहते. जोपर्यंत तिच्यावर बाह्यबलाचा प्रभाव पडत नाही तोपर्यंत त्या वस्तूच्या गतीत काहीही बदल होत नाही. 

आता महर्षी कणाद यांचे सूत्र पाहू :

वेगः निमित्तविशेषात कर्मणो जायते| 

वस्तूच्या गतीत बदल होण्यासाठी बलाची आवश्यकता असते 

(change of motion is due to impressed force ) 

संयोगविभागवेगानां कर्म समानम् ।  वैशेषिक-१,१.२०

( if two bodies have to collide or move away, the cause of is common which is KARMA - Force ) 

दोन वस्तूंची टक्कर होण्यासाठी किंवा त्या दोन वस्तू एकमेकांपासून दूर जाण्यासाठी बलाची आवश्यकता आहे.

न द्रव्याणाम् कर्म |   वैशेषिक-१. १.२१

The KARMA (Force ) can not come from the bodies. It has to be external 

म्हणजेच दोन वस्तूंवर जे बल प्रयुक्त केले असते ते बाह्यबल असते.. ह्याचा सोपा अर्थ असा की 

(change of motion is due to impressed force) वेग हा कर्म केल्यामुळे म्हणजे बलामुळे (force ) निर्माण होतो. 

येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपले ऋषी हे अत्यंत प्रयोगशील होते. निरनिराळे प्रयोग करून त्याच्यावर खूप संशोधन करून त्यांनी निष्कर्ष मांडले आहेत. महर्षी कणाद ह्यांचा वैशेषिक दर्शन हा एक उत्कृष्ठ वैज्ञानिक ग्रंथ आहे. त्यात विविध वैज्ञानिक सिद्धांत सामावलेले आहेत. आज आपण जे न्यूटनचे गतिविषयीचे नियम वाचतो ते मुळात महर्षी कणाद यांचे आहेत. *महर्षी कणाद यांचा काळ अंदाजे इ. स. पू. ६ वे ते २ रे शतक असा आहे आणि न्यूटन यांचा काळ इ. स. १६४३ ते इ. स.१७२७ असा आहे*. ह्याचा अर्थ न्यूटनच्या आधीच साधारण १००० वर्षे महर्षी कणाद यांनी गतिविषयीचे नियम त्यांच्या ग्रंथात मांडले आहेत आणि त्याचे दस्तऐवजीकरणसुद्धा (Documentation ) केले आहे. हे सर्व समोर दिसत असून सुद्धा सर्व श्रेय महर्षी कणाद यांना देण्याच्या ऐवजी न्यूटन यांना दिले गेले*. वैदिक संस्कृती ही अतिशय प्राचीन संस्कृती असून हिंदू र्म हा वैज्ञानिक धर्म आहे. परंतु, पाश्चिमात्य विद्वानांनी जाणीवपूर्वक भारतीयांचे खच्चीकरण करून आपल्याला मागास ठरवले. आता आपल्याला *स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही आपल्या वैज्ञानिक ऋषींची उपेक्षा का? भौतिकशास्त्र शिकविणाऱ्या भारतातील एकाही संस्थेला दाखल घ्यावी असे वाटले नाही का?* 

माझी भारत सरकारला आणि मराठी विज्ञान परिषद अशा संस्थांना हात जोडून विनंती आहे की ह्यासंदर्भात *योग्य तो पाठपुरावा करून प्राचीन भारतीय ऋषींच्या कार्याला, त्यांच्या वैज्ञानिक शोधांना प्रतिष्ठा मिळवून द्यावी.


पुढच्या लेखात  महर्षी कणाद यांचे अजून काही गतिविषयीचे नियम पाहू. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

Wednesday, 21 December 2022

वेदविज्ञानरंजन - १३ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग १

 वेदविज्ञानरंजन - १३ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग १

ह्या  लेखांमध्ये आपण पृथ्वी गोल आहे ह्या सिद्धांताची वैदिक ग्रंथांतील उदाहरणे पाहिली. आजच लेखात आपण पृथ्वीचे परिवलन (स्वतःभोवती फिरणे ) , परिभ्रमण (सूर्याभोवती फिरणे ), दिवस- रात्र यांचे चक्र ह्याविषयी माहिती घेऊया. 

पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग १

अथर्ववेद कांड १२, सूक्त १ आणि मंत्र ४८  मध्ये लिहिले आहे :

म॒ल्वं बिभ्र॑ती गुरु॒भृद्भ॑द्रपा॒पस्य॑ नि॒धनं॑ तिति॒क्षुः।

व॑रा॒हेण॑ पृथि॒वी सं॑विदा॒ना सू॑क॒राय॒ वि जि॑हीते मृ॒गाय॑ ॥१.४८॥

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

मल्वम् । बिभ्रती । गुरुऽभृत् । भद्रपापस्य । निऽधनम् । तितिक्षु: । वराहेण । पृथिवी । सम्विदाना । सूकराय । वि । जिहीते । मृगाय 

मल्वम् म्हणजे धारण सामर्थ्य , गुरुभृत् म्हणजे गुरुत्व, बिभ्रति म्हणजे धारण करणारी (अशी आपली पृथ्वी आहे ) (इथे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ति कार्यरतआहे हे सांगितले आहे. त्यासाठी आपल्याला न्यूटनची आवश्यकता नाही.) 

भद्रपापस्य म्हणजे चांगले, वाईट, निऽधनम् समूह, तितिक्षु: म्हणजे सहन करणारी (अशी पृथ्वी ) वराहेण म्हणजे मेघांबरोबर (काळ्या ढगांबरोबर )(येथे वराह ह्याचा अर्थ डुक्कर असा नसून मेघ असा आहे )   सम्विदाना म्हणजे मिळालेली पृथिवी सूकराय म्हणजे सुखद किरणे असणार्‍या , मृगाय    म्हणजे सूर्यासाठी, वि  जिहीते म्हणजे विविध प्रकार प्राप्त करते.

आता ह्याचा सोपा अर्थ पाहू :

 पृथ्वी आपल्या धारण शक्तीमुळे (गुरूत्वबल ) सर्व पदार्थांना आपल्याकडे धरून ठेवते. पृथ्वी सूर्यासमोरून चालते त्यामुळे पाणी आकाशात चढते (मेघ ) आणि  पृथ्वीवर वर्षाव होतो. प्रस्तुत श्लोकातून पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीवर गुरूत्वबल आहे ह्या दोहोंचा अर्थबोध होतो.

आता आपण पृथ्वीच्या परिभ्रमणाचा यजुर्वेदामधील उल्लेख पाहू. यजुर्वेद अध्याय ३ मंत्र ६ मध्ये खालील श्लोक आहे. 

आयं गौः पृश्नि॑रक्रमी॒दस॑दन् मा॒तरं॑ पु॒रः। पि॒तरं॑ च प्र॒यन्त्स्वः॑ 

आता ह्याचा अन्वयार्थ पाहू :

आ। अयम्। गौः। पृश्निः। अक्रमीत्। असदत्। मातरम्। पुरः। पितरम्। च। प्रयन्निति प्रऽयन्। स्वरिति स्वःआ) अभ्यर्थे (अयम्) प्रत्यक्षः (गौः) यो गच्छति स भूगोलः। गौरिति पृथिवीनामसु पठितम्। (निघं॰१.१) गौरिति पृथिव्या नामधेयम्। यद् दूरं गता भवति। यच्चास्यां भूतानि गच्छन्ति (निरु॰२.५) (पृश्निः) अन्तरिक्षे। 


ही गोलरूपी पृथ्वी  पितरम्  म्हणजे पालन करणार्‍या, स्वः म्हणजे सूर्यलोकाच्या, पुरः म्हणजे पुढे पुढे, मातरम् म्हणजे आपल्या योनीरूप जलासमवेत, पृश्निः म्हणजे अंतरिक्ष - अंतराळात, आक्रमित म्हणजे चारही बाजूंनी फिरते. 

ह्याचा सोपा अर्थ पाहू : 

माणसांनी हे जाणले पाहिजे की, जल व अग्नी यांनी निर्माण झालेली ही पृथ्वी जलासह अंतरिक्षामध्ये सूर्याभोवती आपल्या कक्षेत फिरत असते त्यामुळेच क्रमाक्रमाने दिवस व रात्र शुक्ल किंवा कृष्णपक्ष, ऋतू व अयन इत्यादी काल विभाजन होत असते.

अथर्ववेद कांड १२, सूक्त १, मंत्र १० मध्ये लिहिले आहे : 

याम॒श्विना॒वमि॑मातां॒ विष्णु॒र्यस्यां॑ विचक्र॒मे।

ह्याचा अर्थ पाहू :

(याम्)  ज्या (भूमीवर ) (अश्विनौ) दिन आणि रात्र (अमिमाताम्) मोजतात म्हणजेच पृथ्वीवर दिवस आणि रात्र असे चक्र सुरु असते कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते (पृथ्वीचे परिवलन) 

अथर्ववेद कांड १२, सूक्त १, मंत्र १८ मध्ये लिहिले आहे : 

म॒हत्स॒धस्थं॑ मह॒ती ब॒भूवि॑थ म॒हान्वेग॑ ए॒जथु॑र्वे॒पथु॑ष्टे।

महती म्हणजे तू खूप मोठी आहेस, महत् सधस्थम् म्हणजे तुझा सहवास सुद्धा खूप मोठा आहे. महान्वेग: म्हणजे तुझा मोठा वेग एजथुः म्हणजे चालणे (सूर्याभोवती फिरणे ) आणि वेपथुः म्हणजे हालणे (स्वतःभोवती फिरणे ) हेसुद्धा मोठे आहे. 

सर्व विद्वानांनी वेदांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास केला तर अजून काही नवीन सिद्धांत सापडतील की जे अजून आधुनिक विज्ञानाने मांडले नाहीत. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...