माझा परिचय

Showing posts with label ऋग्वेद. Show all posts
Showing posts with label ऋग्वेद. Show all posts

Sunday, 30 April 2023

वेदविज्ञानरंजन - ५४

 


#वेदविज्ञानरंजन_५४

आज आपण प्रकाश, त्याचे सात रंग, इंद्रधनुष्य ह्याची माहिती घेणार आहोत.

थोर भारतीय खगोल शास्त्रज्ञ वराहमिहीर याने आपल्या बृहद् संहिता नवाच्या ग्रंथात खालील श्लोक लिहिला आहे.
🚩
सुर्यस्य विविधवर्णः पवनेन विघट्टिताः कराः साभ्रे |
वियति धनु संस्थानः ये दृश्यते तदिन्द्रधनुः ||
🚩
ह्याचा अर्थ इंग्रजी भाषेत पाहू :

The multicolored rays of the Sun being dispersed by the wind in a cloudy sky are seen in the form of a bow which is rainbow

ह्याचा अर्थ मराठी भाषेत पाहू :

ढगाळ वातावरणात सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन आकाशात *इंद्रधनुष्य* तयार होते.

ग्रीक तत्त्ववेत्ता अरिस्टोटल आणि महान शास्त्रज्ञ न्यूटन यांसारख्या परदेशी संशोधकांनी इंद्रधनुष्य, प्रकाशाचे परावर्तन, अपवर्तन ह्याचा सिद्धांत मांडला अशी मान्यता आहे. परंतु वर *उल्लेख केलेल्या श्लोकामध्ये ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात प्रस्तुत सिद्धांत मांडल्याचे दिसून येते.*

सूर्याची सात किरणे

ऋग्वेद मंडल १ सूक्त ५० मंत्र ८
🚩
सप्त त्वा हरितो रथे वहन्ति देव सूर्य । शोचिष्केशं विचक्षण ॥
🚩

सप्त) सप्तविधाः किरणाः (त्वा) त्वाम् (हरितः) यैः किरणै रसान् हरति त आदित्यरश्मयः। हरितइत्यादिष्टोपयोजनना०। निघं० १।१५। (रथे) रमणीये लोके (वहन्ति) (देव) दातः (सूर्य्य) ज्ञानस्वरूप ज्ञानप्रापक वा (शोचिष्केशम्) शोचींषि केशा दीप्तयो रश्मयो यस्य तं सूर्य्यलोकम् (विचक्षण) विविधान् दर्शक ॥८॥

जसे किरणांशिवाय सूर्याचे दर्शन होऊ शकत नाही. तसेच वेदांना ठीक ठीक जाणल्याशिवाय परमेश्वराचे दर्शन होऊ शकत नाही, हे निश्चयपूर्वक जाणावे. ॥ ८ ॥

*सप्त हरितः* म्हणजे *सात किरण* येथे हरितः ह्याचा अर्थ हिरवा रंग असा नसून *किरण* असा आहे.

ऋग्वेद  मंडल १ सूक्त ५० मंत्र ९

🚩
अयुक्त सप्त शुन्ध्युवः सूरो रथस्य नप्त्यः । ताभिर्याति स्वयुक्तिभिः ॥
🚩

यथा सूरो याः सप्त नप्तः शुन्ध्युवः सन्ति ता रथस्य मध्येऽयुक्त तैः सह याति प्राप्नोति तथा त्वं स्वयुक्तिभिः सर्वं विश्वं जगत्संयोजयसीति वयं विजानीमः ॥९॥

भावार्थः - अत्र वाचकलुप्तोपमालंकारः। यः सूर्यवत् स्वयं प्रकाश आकाशमिव व्याप्त उपासकानां शुद्धिकरः परमेश्वरोस्ति स खलु सर्वैर्मनुष्यैरुपासनीयो वर्त्तते ॥९॥

जो सूर्याप्रमाणे स्वतःचा स्वतःच प्रकाशस्वरूप, आकाशाप्रमाणे सर्वत्र व्यापक, उपासकांना पवित्र करणारा, असा परमेश्वर आहे, तोच सर्व माणसांचा उपास्य देव आहे. ॥ ९ ॥
*सप्त शुन्ध्युन्व* शुद्ध करणारी सूर्याची किरणे.

ऋग्वेद मंडल ४ सूक्त ५० मंत्र ४

बृहस्पतिः प्रथमं जायमानो महो ज्योतिषः परमे व्योमन् |
सप्तास्यस्तुविजातो रवेण वि सप्तरश्मिरधमत् तमांसि ||४ ||

*सात मुख असलेला, अनेक प्रकारे प्रगट होणारा, सात किरणे असलेला, आकाशात सर्वप्रथम प्रगट होणारा सूर्य आपल्या प्रकाशाने अंधाराचा नाश करतो.*

ऋग्वेद मंडल ५ सूक्त ४५ मंत्र ९

आ सूर्यो यातु सप्ताश्वः क्षेत्रं यदस्योर्विया दीर्घयाथे |
रघुः श्येनः पतयदन्धो अच्छा युवा कविर्दीदयद् गोषु गच्छन् ||९||

*सूर्याने सात घोड्याने* युक्त होऊन यावे. कारण हे दीर्घ क्षेत्र त्याच्याच प्रवासासाठी आहे. हा ज्ञानी सूर्य किरणाच्या मध्ये राहतो आणि प्रकाशित होतो.

हे सर्व लिहिण्याचे कारण हेच की प्रत्येक मंत्रात सूर्याच्या सात घोड्यांचा उल्लेख आहे. हे सात घोडे म्हणजे सूर्याचे सात रंगांचे किरण सूर्यप्रकाशापासून सात रंग तयार होतात ह्याचे ज्ञान भारतीयांना वेदकाळातपासून होते.

🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

वेदविज्ञानरंजन - ५३

 

#वेदविज्ञानरंजन_५३

🌺 *पृथ्वी - सूर्य संबंध* 🌺

आजच्या लेखात आपण सूर्य आणि पृथ्वी ह्यांचे परस्पर संबंध पाहू.

यजुर्वेद अध्याय ३३ मंत्र ४३ खालीलप्रमाणे आहे

🚩 आ कृष्णेन रजसा वर्तमानः निऽवेशयन् अमृतम् मर्त्यम् च हिरण्येन सविता रथेन आ देवः याति भुवनानि पश्यन् ||४३ || 🚩

हे मनुष्याः! यथा एतद्भूगोलाद्यैर्लोकैः सह तस्य सूर्य्यस्याकर्षणं यो वृष्टिद्वारा अमृतात्मकमुदकं वर्षयति यश्च सर्वेषां मूर्तद्रव्याणां दर्शयितास्ति तथा सूर्य्यादयोपीश्वराकर्षणेन ध्रियन्त इति वेद्यम्॥४३॥

ह्याचा सोपा अर्थ पाहू :

सूर्य (सविता ) भूगोल (पृथ्वी ) आणि इतर गोलांना म्हणजे ग्रहांना *आपल्या शक्तीने आकर्षून घेतो* आणि वृष्टीद्वारे अमृतरूपी जलवर्षाव करतो.

ऋग्वेद - मण्डल  १; सूक्त  ३५ ; मन्त्र ९ खालीलप्रमाणे आहे.

🚩 हिरण्यपाणिः । सविता । विचर्षणिः । उभे इति । द्यावापृथिवी इति । अन्तः । ईयते । अप । अमीवाम् । बाधते । वेति । सूर्यम् । अभि । कृष्णेन । रजसा । द्याम् । ऋणोति॥ 🚩

। हे सभापते यथायं सूर्योबहुभिर्लोकैः सहाकर्षणसंबन्धेन वर्त्तमानः सर्वं वस्तूजातं प्रकाशयन् प्रकाशपृथिव्योरान्तर्यं करोति तथैव त्वया भवितव्यमिति ॥९॥

ह्याचा सोपा अर्थ पाहू :

जसा हा सूर्य पुष्कळ गोलांना म्हणजे अनेक ग्रहांना आपल्या *आकर्षण शक्तीने स्थिर ठेवतो* (बांधून ठेवतो ), सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याचप्रमाणे पृथ्वी आणि द्युलोक म्हणजे आकाश यांचा संयोग करतो, तसेच आचरण ठेवावे.

ऋग्वेद आणि यजुर्वेद ह्यांनी पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण, पृथ्वी - सूर्य ह्यांच्यातील गुरुत्वाकर्षण शक्ती इत्यादी खगोलीय सिद्धांतांचे अतिशय उत्तम रीतीने विश्लेषण केले आहे. वेद हे अनादी काळापासून अस्तित्वात असून त्यांचा काळ निश्चित करणे सुद्धा अवघड आहे. जगातील पहिले लिखित वाङ्मय म्हणून सर्व वेदांना जगाने मान्यता दिली आहे.
गुरुत्वाकर्षण शक्ती, पृथ्वी गोल आहे अशा अनेक सिद्धांताचे श्रेय न्यूटन, कोपर्निकस, गॅलिलिओ अशा परदेशी शास्त्रज्ञांना देण्यात आले आहे. परंतु, अनादिकाळापासून असलेल्या वेदांना मात्र ह्याचे श्रेय नाही. मेकॉले ह्यांनी लादलेल्या शिक्षणपद्धतीमुळे आपले पुरातन वाङ्मय नजरेआड झाले आणि आपले अपरिमित नुकसान झाले आहे. माझी सर्वांनाच विनंती आहे की आपल्या मुलांना ही सर्व माहिती द्यावी.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

जगभरातील सर्व मराठी माणसांना ह्या ज्ञानाचा लाभ व्हावा ह्यासाठी वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेतील सर्व लेख खालील website वर उपलब्ध आहेत. सर्वांनी ह्या site वर लेख जरूर वाचावेत आणि आपले अभिप्राय द्यावेत ही नम्र विनंती.
*www.ancientindianscience.com*

प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

Sunday, 25 December 2022

वेदविज्ञानरंजन - ३३ : रामायणातील वैज्ञानिक संदर्भ - भाग - १

 वेदविज्ञानरंजन - ३३ : भाग - १

रामायणातील वैज्ञानिक संदर्भ - भाग - १

आज आपण सूर्याच्या पृष्ठभागावरील सौरडाग (सौरकलंक ) (Sunspot) आणि सौरज्वाला (Solar flares ) ह्याबद्दल पुरातन वैदिक ग्रंथांतील माहिती घेऊ. 

आधी सौरडाग कसे तयार होतात हे पाहू :

सूर्याच्या पृष्ठभागावरील काही विवक्षित ठिकाणी होणाऱ्या चुंबकीय घडामोडींमुळे त्या ठिकाणच्या तापमानात घट होते. अशा ठिकाणाचे तापमान आजूबाजूच्या भागापेक्षा कमी झाल्यामुळे तो भाग आपल्याला डागांच्या रूपात काळ्या रंगाचा दिसतो.

आता ह्या सौरडागांचे निरीक्षण सर्वप्रथम प्रभूश्रीरामचंद्रांनी केले आणि त्याचा स्पष्ट उल्लेख रामायणात महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी केला आहे. रामायण युद्धकांड सर्ग ४१, श्लोक १८ मध्ये ह्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.


ह्रस्वो रूक्षोऽप्रशस्तश्च परिवेषः सुलोहितः

आदित्यमण्डले नीलं लक्ष्म लक्ष्मण दृश्यते ||१८||

ह्याचा अर्थ पाहू :

हे लक्ष्मणा! सूर्यमंडलात (आदित्यमण्डले ) लहान (ऱ्हस्वः ), रूक्ष (रूक्ष ), अमंगलकारी (अप्रशस्तः ) आणि अत्यंत लाल वर्तुळ (परिवेषः सुलोहितः) दिसून येत आहे. त्याचबरोबर तेथे काळे (नीलम् ) डाग म्हणजे चिह्न (लक्ष्म ) दृष्टिगोचर आहे.

सौरज्वाला :

रक्तचंदन्दनसंकाशा संध्या परमदारुणा ।

ज्वलच्च निपतत्येतदाद् आदित्यादग्निमण्डलम् ॥

अत्यंत दारूण संध्या रक्तचंदनाप्रमाणे लाल दिसून येत आहे. सूर्यापासून हा जळत्या आगीचा पुंज खाली कोसळत आहे. येथे सौरज्वालेचा स्पष्ट उल्लेख आहे. 

रावणाशी युद्ध करण्याच्या आधी काही अशुभ सूचक संकेत श्रीराम देत आहेत. त्यामुळे राक्षसकुळाचा नाश होणार हे निश्चित आहे. ह्यात श्रीरामांनी सौरडाग म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावरील काळे डाग पाहिले असा स्पष्ट उल्लेख आहे. येथे नीलम् असा शब्द जरी असला तरी त्याचा एक अर्थ निळा आणि दुसरा अर्थ सावळा, काळा असाही आहे. आपल्याला जर मार लागला तर अंगावर काळेनिळे डाग पडून ते प्रचंड दुखतात. त्यामुळे येथे नीलम् ह्याचा अर्थ निळा नसून काळा असाच आहे आणि तसेच स्पष्टपणे महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले आहे.  आता जे महाभाग रामायण ही कविकल्पना आहे, राम जन्मलाच नव्हता अशी पोरकट विधाने करता त्यांना किती समजवणार? 

सौरडाग नुसत्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही.  मुळात सूर्याकडेच नुसत्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही (उगवत्या - मावळत्या सूर्याकडे पाहता येते. पण त्यावेळी डाग दिसू शकत नाहीत ) श्रीराम हा साक्षात श्रीविष्णूंचा अवतार असल्याने तेही अनंतकोटी ब्रह्मांडनायक आहेत त्यामुळे हे सौरडाग त्यांना सहज दिसले असणार. आता त्यांना सामान्य माणूस मानले तर त्याकाळी निश्चित प्रगत दुर्बिणी (telescope ) असणार ज्यायोगे त्यांनी सौरडागांचे अवलोकन केले असेल.दुर्बीण कशी तयार करावी ह्याचे वर्णन भृगुशिल्पसंहितेत दिले आहे. ह्याबाबत माझ्या आधीच्या लेखात सर्व माहिती दिलेली आहेच. रामायण ही कविकल्पना नाही तर घडून गेलेला इतिहास आहे. त्याचे पुरावे निश्चित आहेत.महर्षी वाल्मिकी अत्यंत ज्ञानी होते त्यामुळे सर्व बारीकसारीक घडामोडी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. रामायण अभ्यासकांनी रामायणातील वैज्ञानिक आणि खगोलीय घटनांकडेसुद्धा लक्ष देऊन शास्त्रीय दृष्टीने त्यांचा अभ्यास करावा असे माझे मत आहे. 

ह्याचा अजून एक उल्लेख ऋग्वेदात सापडतो. 

ऋग्वेद मंडल १, सूक्त १६४, मंत्र १४

सूर्यस्य चक्षु रजसैत्यावृतम् |

सूर्याचे डोळे (सौरडाग ) धुळीने व्यापलेले  (आवृत्त असतात ) येथे सौरवादळ किंवा सूर्यावरील हेलियम वायू यासंबंधी उल्लेख असावा असे वाटते. 

नेहमीप्रमाणे सौरडाग अवलोकन करण्याचे श्रेय आपण परदेशी वैज्ञानिकांना दिले. सौरडाग पाहिल्याची नोंद (I Ching ) ह्या चिनी शास्त्रज्ञाने साधारण इ. स. पू. ३६४ मध्ये केली आहे.  परंतु, त्याच्या हजारो वर्षे आधीच त्रेतायुगात प्रभू श्री रामचंद्र यांनी सौरडाग पाहिल्याचे उल्लेख असून सुद्धा त्याचे श्रेय श्रीरामांना, रामायणाला नाही. माझी सर्वांना विनंती आहे की महर्षी वाल्मिकी ह्यांनी लिहिलेले रामायण मुळातून वाचावे आणि शास्त्रीयदृष्ट्या त्याचा अर्थ समजून घ्यावा.रामायण, महाभारत, श्रीमद्भागवत, श्रीमद्भगवद्गीता हे ग्रंथ फक्त देवाची स्तुती करण्यासाठी लिहिलेले नसून त्यात शास्त्रीय ज्ञान आणि वैज्ञानिक सिद्धांत आहेत हेसुद्धा लक्षात घ्यावे.

🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩

Friday, 23 December 2022

वेदविज्ञानरंजन - २४ : वेदांतील संख्यांचा उल्लेख

वेदविज्ञानरंजन  - २४ : वेदांतील संख्यांचा उल्लेख

शुक्ल यजुर्वेद ग्रंथांत अध्याय १७ श्लोक २ मध्ये १० च्या पटीतील संख्यांचा स्पष्ट उल्लेख आहे.

इमा मे ऽ अग्न ऽ इष्टका धेनवः सन्त्व् एका च दश च दश च शतं च शतं च सहस्रं च सहस्रं चायुतं चायुतं च नियुतं च नियुतं च प्रयुतं चार्बुदं च न्यर्बुदꣳ समुद्रश् च मध्यं चान्तश् च परार्धश् चैता मे ऽ अग्न इष्टका धेनवः सन्त्व् अमुत्रामुष्मिंल् लोके ॥

ह्याचा अर्थ आणि त्यामधील गणित आपण पाहू :

हे अग्नदेवता!  ह्या विटा (इष्टका ) (यज्ञात वापरल्या जाणाऱ्या विटा ) माझ्यासाठी गाई होवोत ( म्हणजे गाईप्रमाणे फळ देणाऱ्या, मदत करणाऱ्या )(पुढे त्या विटांची संख्या सांगितली आहे ) एक (१)  दश (१०)  शत (१००)  सहस्र (१,०००) अयुत (१०,०००) नियुत (लक्ष या १००,०००)  प्रयुत (१,०००,०००)  अर्बुद (१००,०००,०००) न्यर्बुद (अब्ज १,०००,०००,०००) समुद्र (१००,०००,०००,०००,०००) मध्य (१,०००,०००,०००,०००,०००)  अन्त्य (१०,०००,०००,०००,०००,०००)  परार्ध (१००,०००,०००,०००,०००,०००)  


१ ह्या संख्येवर सतरा शून्ये ठेवल्यानंतर तयार होणाऱ्या संख्येला सुद्धा त्यात परार्ध असे नावे होते. ह्या सर्व संख्यांचा उपयोग यज्ञवेदीची रचना करण्यासाठी व्हावयाचा. यज्ञवेदी कशा आकाराची असावी, त्यात किती विटा  असाव्यात ह्याचे शास्त्र असायचे. उगाचच काहीतरी रचून यज्ञ केले जात नसत त्याला शास्त्रीय बैठक होती. आता वरील संख्यांना अजून काही नावे दिली आहेत तीही पाहू :

भास्कराचार्य यांच्या लीलावती (१०-११) ग्रंथात 

खालील उल्लेख आहेत :

एक-दश-शत-सहस्रायुत-लक्ष-प्रयुत-कोटयः क्रमशः।

अर्बुदमब्जं खर्व-निखर्व-महापद्म-शङ्कवस्तस्मात्॥

जलधिश्चान्त्यं मध्यं परार्धमिति दशगुणोत्तराः संज्ञाः।

संख्यायाः स्थानानां व्यवहारार्थं कृताः पूर्वैः॥

ह्याचा अर्थ पाहू :

eka (एक): one (10^0=1)

daśa (दश): ten (10^1=10)

śata (शत): hundred (10^2=100)

sahasra (सहस्र): thousand (10^3=1,000)

ayuta (अयुत): ten thousand (10^4=10,000)

lakṣa (लक्ष): hundred thousand (10^5=100,000)

prayuta (प्रयुत): million (10^6=1,000,000)

koṭi (कोटि): ten million (10^7=10,000,000)

arbuda (अर्बुद): hundred million (10^8=100,000,000)

abja (अब्ज): billion (10^9=1,000,000,000)

kharva (खर्व): ten billion (10^10=10,000,000,000)

nikharva (निखर्व): hundred billion (10^11=100,000,000,000)

mahāpadma (महापद्म): trillion (10^12=1,000,000,000,000)

śaṅku (शङ्कु): ten trillion (10^13=10,000,000,000,000)

jaladhi (जलधि): hundred trillion (10^14=100,000,000,000,000)

antya (अन्त्य): quadrillion (10^15=1,000,000,000,000,000)

madhya (मध्य): ten quadrillion (10^16=10,000,000,000,000,000)

parārdha (परार्ध): hundred quadrillion (10^17=100,000,000,000,000,000)


कृष्ण यजुर्वेदात संख्या चढत्या क्रमाने संख्या लिहिल्या आहेत.

सकृत्ते अग्ने नमः | द्विस्ते नमः |....

दशकृत्वस्ते नमः | शतकृत्वस्ते नमः |

आसहस्रकृत्वस्ते नमः |

अपरिमितकृत्वस्ते नमः |


O fire, salutations to you once, twice, thrice...

Salutations ten times, hundred times, thousand time,

Salutations to you unlimited times

हे अग्नीदेवता!   तुला एकदा, दोनदा, तीनदा, दहा वेळा, शंभर वेळा, हजार वेळा नमस्कार असो. वरील श्लोकात दिसून येते. की संख्येच्या पुढे शून्य ठेवले असता संख्येची किंमत बदलते ही गोष्ट भारतीयांना वेदकाळापासून ज्ञात होती. 

तैत्तिरीय संहिता ७.२.४९ ह्यात दहाच्या पटीत खालील संख्यांचा उल्लेख आहे. 

शताय स्वाहा सहस्राय स्वाहा अयुताय स्वाहा नियुताय स्वाहा प्रयुताय स्वाहा अर्बुदाय स्वाहा न्यर्बुदाय स्वाहा समुद्राय स्वाहा मध्याय स्वाहा अन्ताय स्वाहा... परार्धाय स्वाहा

 वरील श्लोकात पुन्हा एकदा दहाच्या पटतील संख्यांचा चढता क्रम दिसून येतो. 

ऋग्वेद २.१८.५ ह्यात खालील मंत्र आहे 

आ विंशता त्रिंशता याह्यर्वाङ् चत्वारिंशता हरिभिर्युजानः |

आ पञ्चाशता सुरथेभिरिन्द्रा षष्ट्या सप्तत्या सोमपेयम् ||५ ||

हे इंद्र! तू वीस, तीस घोड्यांद्वारे आमच्या जवळ ये. चाळीस घोड्यांनी युक्त असा तू आमच्या पर्यंत ये. पन्नास, साठ, सत्तर घोड्यांनी युक्त अश्या रथात बसुन सोमरस पिण्यासाठी आमच्याकडे ये. 

परकीय आक्रमण सातत्याने होत राहिल्यामुळे आपण आपल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानापासून वंचित राहिलो. इंग्रजांनीच सर्व काही आपल्याला शिकविले ह्याच भ्रमात आपण आहोत आणि आपण भारतीय कसे मागास होतो हेच बिंबवण्याचे कार्य इंग्रजांनी केले.

शून्य ही भारताने जगाला दिलेली देणगी  वेद हे अतिप्राचीन असून जगातील पहिले लिखित वाङ्मय म्हणून त्यास मान्यता आहे. ह्यावरून आपल्याला प्राचीन भारतीय ग्रंथातील ज्ञानाची ओळख होते. प्राचीन गणितज्ञ आणि ऋषी यांच्या बुद्धीची चमक दिसून येते. त्यामुळे आम्हाला आम्ही ह्या श्रेष्ठ संस्कृती मध्ये जन्माला आलो ह्याचा सार्थ अभिमान आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩



वेदविज्ञानरंजन - २२ : ब्रह्मांडातील अनेक सूर्य

वेदविज्ञानरंजन - २२ : ब्रह्मांडातील अनेक सूर्य

आजच्या लेखात आपण सूर्य - चंद्र - पृथ्वी यांचा परस्पर संबंध आणि ब्रह्मांडातील अनेक सूर्य  यांची माहिती घेणार आहोत. 

ऋग्वेद मंडल १०, सूक्त ८५, मंत्र १ मध्ये खालील मंत्र आहे :

सत्येन उत्तभिता भूमिः सूर्येण उत्तभिता द्यौः ऋतेन आदित्याः तिष्ठन्ति दिवि सोमः अधि श्रितः ||

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

(भूमिः सत्येन उत्तभिता ) म्हणजे पृथ्वी अग्नीद्वारा सांभाळली जाते. (द्यौः सूर्येण उत्तभिता ) म्हणजे प्रकाशित तारांगण आणि आकाश सूर्यामुळे सांभाळले जाते. (आदित्याः ऋतेन तिष्ठन्ति ) सूर्याची आदान शक्ती आहे. (दिवि सोमः अधिश्रितः ) चंद्र सूर्याच्या आश्रयाला आहे. 

आता ह्याचा सोपा अर्थ पाहू :

ब्रह्माने पृथ्वीला आकाशात धारण केले आहे. 

म्हणजेच ब्रह्मांडात पृथ्वी आहे. 

सूर्य हा द्युलोकाला म्हणजे नक्षत्र तारामंडल यांना प्रकाशित करतो. त्यानंतर सोम म्हणजे चंद्र हा सूर्याचा आश्रित आहे. म्हणजेच तोसुद्धा सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने बांधला गेला आहे आणि सूर्यामुळे तो प्रकाशित होतो. 

यजुर्वेद अध्याय १८ मंत्र ४० मध्ये म्हटले आहे की 

सुषुम्णः सूर्यरश्मिश्चन्द्रमा नक्षत्राणि अप्सरसः भेकुरयः नाम 

ह्याचा अर्थ पाहू : ज्यामुळे उत्तम सुख प्राप्त होते असा सूर्य चंद्राला प्रकाशित करतो. आकाशात पसरलेली नक्षत्रे ही चंद्राच्या अप्सरा आहेत असे वाटते. ह्यात सूर्याने चंद्र प्रकाशित होतो असे स्पष्ट दिसते. 

माझ्या माहिती प्रमाणे  ग्रीस तत्त्ववेत्ता, गणितज्ञ अनेक्सागोरस (Anaxagoras ) ( जन्मः इ. स. पू. ४९९ आणि मृत्यू इ. स. पू. ४२८ ) ह्यांनी असे विधान केले होते की चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. तो सूर्याच्या किरणांनी प्रकाशित होतो. त्याला ह्या वक्तव्यासाठी तुरुंगवास भोगावा लागला होता. म्हणजे त्या काळी चर्चच्या विरोधात काही वक्तव्य केले की लगेच शिक्षा करीत असत.

 (https://mathshistory.st-andrews.ac.uk/Biographies/Anaxagoras/) 

आपले वेद तर इ. स. पू. हजारो वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत आणि त्यात ह्या सर्व गोष्टींचा स्पष्ट उल्लेख आहे. मग मला सांगा की आपण मागास का आपल्याला मागास म्हणणारे पाश्चात्य विद्वान मागास? 

अनेक सूर्य, अनेक ब्रह्मांड

अथर्ववेद कांड १३, सूक्त ३, मंत्र १० मध्ये सात सूर्याचा उल्लेख आहे

यस्मिन् सूर्या अर्पिताः सप्त साकम् ||१०||

ब्रह्मांड जे एकत्र झालेल्या तेजाने व्यापले आहे त्यात सात सूर्य एकत्र राहतात. त्यांची तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत : शुक्ल, नील, पीत, रक्त, हरित, कपिश, चित्ररूप


 ताण्ड्य ब्राह्मण ग्रंथातील अध्याय २३, खंड १५, मंत्र ३ मध्ये पुन्हा एकदा सात सूर्यांचा उल्लेख केला आहे.

त्रि वै सप्त सप्तादित्याः ||३||

ऋग्वेद मंडल ९, सूक्त ११४, मंत्र ३  ह्या मध्ये अनेक सूर्यांचा उल्लेख केला आहे. 

सप्तदिशो नानासूर्याः सप्त होतार ऋत्विज:|

देवा आदित्या ये सप्त तेभिः सोमाभि रक्ष न 

इन्द्रायेन्दो परि स्रव||

सात दिशा, ऋतू, यज्ञकर्ता सात ऋत्विज आणि सात सूर्य आहेत. हे सोमा! त्यांच्या बरोबर आमचे पण रक्षण कर आणि तू इंद्रासाठी वाहत रहा. 

आपले आधुनिक विज्ञान अजून पर्यंत सात सूर्य कोणते आहेत ते शोधू शकले नाहीत. इथे मी म्हणतो की आमच्या वेदांत उल्लेख आहेत पण आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाही. आज इथेच थांबतो पुढील लेखात नवीन विषय घेऊन भेटू. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩



Thursday, 22 December 2022

वेदविज्ञानरंजन - २१: सूर्य पृथ्वी आकर्षण

वेदविज्ञानरंजन - २७ : सूर्य पृथ्वी आकर्षण 

सूर्य आणि पृथ्वी यांतील आकर्षण सबंध ह्यावर आजचा लेख आहे. आपण सविस्तर माहिती घेऊ. जगातील सर्वांत प्राचीन अश्या ऋग्वेदातील मंडल १०, सूक्त १४९, मंत्र १ मध्ये खालील मंत्र आहे :

सविता यंत्रैः पृथिवीम् अरम्णात् अस्कम्भने सविता द्याम् अदृंहत् अश्वम् इव अधुक्षत् धुनिम् अन्तरिक्षम् अतूर्ते बद्धम् सविता समुद्रम् ||

(सविता ) सूर्य (यंत्रैः ) नियंत्रण सामर्थ्याने (पृथिवीम् ) पृथ्वीला (अस्कम्भने ) निरालंब अंतराळात (अरम्णात् ) सांभाळतो, अवलंबित करतो (द्याम् ) द्युलोक (अदृंहत् ) वर ताणतो (अतूर्ते अन्तरिक्षम् ) अभेद्य, सूक्ष्म, अचल अशा अंतराळात (बद्धम् ) अवरुद्ध (समुद्रम् ) येथे तारकांचा नक्षत्रांचा समुद्र (धुनिम् )  मेघ (अश्वम् इव ) घोड्याप्रमाणे (अधुक्षत् ) घोडेस्वारासारखा उत्तेजित करतो.

आता वरील मंत्राचा सोपा अर्थ पाहू. अंतराळातील सूर्य स्वतःच्या नियंत्रण सामर्थ्याने म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्तीने पृथ्वीला सांभाळतो म्हणजेच पृथ्वीला योग्य कक्षेत फिरवतो. द्युलोकाला म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसणारे जे आकाश आहे त्याला ताणून धरतो. घोडेस्वार जसे चाबकाचे फटके मारून किंवा लगामाच्या मदतीने घोड्याला उत्तेजित करतो, त्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी मेघांना उत्तेजित (मेघाला वृष्टीसाठी आंदोलित करतो ) करतो आणि पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी होते.

म्हणजेच पृथ्वी आणि सूर्य यांमध्ये आकर्षण शक्ती आहे हे व्यवस्थित स्पष्टपणे लिहिले आहे.हा सिद्धांत समजण्यासाठी परदेशी वैज्ञानिकांनांची मदत घेण्याची आवश्यकता नाही.

ह्याच सूक्तातील पुढचा मंत्र पाहू :

ऋग्वेदातील मंडल १०, सूक्त १४९, मंत्र २ मध्ये खालील मंत्र आहे :

यत्र समुद्र : स्कभित वि औनत् अपाम् नपात् सविता तस्य वेद अतः भू अतः आ उताथितम् रजः अतः द्यावापृथिवी इति अप्रथेताम् ||

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

(यत्र) ज्याच्या आश्रयाला (समुद्रः स्कभित ) आकाशातील समुद्र, जलाशय वायूद्वारा सांभाळलेला आहे (वि औनत् ) भूमीला ओले करतो (अपां नपात् ) भूमीवर पाणी पडते (सविता तस्य वेद ) परमात्मा सूर्य त्याला जाणतो (अतः भू - अतः रजः उताथितम् )  ह्यातून अंतरिक्ष उत्पन्न होते (अतः द्यावापृथिवी अप्रथेताम् ) द्यावापृथिवी उत्पन्न होतात. आता सोपा अर्थ पाहू :

परमात्म्याच्या (सूर्याच्या ) आश्रयाने आकाशाचा जलाशय वायू सांभाळतो म्हणजे आकाशात मेघ दाटले आहेत त्यात पाणी आहे म्हणजे आकाशात जलाशय, समुद्र आहे असे म्हटले आहे. हे फक्त सूर्यच जाणतो. त्यापासून द्युलोक म्हणजे दीप्तमान आकाश आणि पृथ्वी निर्माण झाली आहे. पृथ्वीवरील पर्जन्यवृष्टी सांगितलेली आहे. तसेच सूर्याकडून पृथ्वीची निर्मिती झाली असे विधान केले आहे. महत्त्वाचा भाग असा की सूर्याने नुसती पृथ्वी निर्माण करून सोडून दिले नाही. तर तो तिला सांभाळतोय म्हणजे आपल्या कक्षेत फिरवून गुरुत्वाकर्षण शक्तीने बांधून ठेवतो आहे सूर्यापासून इतर सर्व ग्रह उत्पन्न झाले असे आधुनिक विज्ञान सांगते. त्यासाठी Big Bang theory शिकविली जाते. पण मग आपल्या ऋग्वेदात पण हेच सांगितले आहे हे वरील दोन मंत्रांवरून स्पष्ट समजते. अर्थात ह्यासाठी ऋग्वेदात नासदीय सूक्त दिले आहे. त्याचा अभ्यास आपण पुढे नक्कीच करणार आहोत. 

थोर खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी आपल्या आर्यभटीयम् गोलपाद - ३७ ह्या ग्रंथात  ग्रहण कसे होते हे सांगितले आहे. 

छादयति शशी सूर्यं शशिनं महती च भूच्छाया |

 अन्वयार्थ : शशी सूर्यं छादयति च महती भूच्छाया शशिनं (छादयति ) |

आता ह्याचा अर्थ पाहू :

चंद्र सूर्याला आच्छादित करतो आणि पृथ्वीची मोठी सावली चंद्राला आच्छादित करते  शेवटी ग्रहण म्हणजे काय? हा सगळा सावल्यांचा खेळ आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो, जेव्हा हे तिघे सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होते असे आधुनिक विज्ञान सांगते. आपण ह्याचे श्रेय केप्लर (इ. स. १६०५ ) यांना देतो. पण आपल्याच आर्यभट्टांनी( इ. स. ४७६ - इ. स. ५५०) केप्लरच्या कितीतरी आधीच ह्याचे ग्रहण होण्याचे कारण दिलेले आहे. 

 🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩

Tuesday, 20 December 2022

वेदविज्ञानरंजन - ८ प्राचीन भारतातील अंतराळयान

 वेदविज्ञानरंजन_८

प्राचीन भारतातील अंतराळयान (Space shuttle ) ह्या विषयावर माहिती पाहू. 

विश्वातील सर्वांत प्राचीन समजल्या जाणार्‍या ऋग्वेदातील मंडल क्र. ४ मधील सूक्त क्र. ३६ श्लोक १  मध्ये ऋभव ऋषींनी रचलेले अंतराळयानाचे वर्णन करणारे सूक्त (ज्याला ऋभु सूक्त असे म्हणतात) खालीलप्रमाणे आहे.

अनश्वो जातो अनभीशुरुक्थ्यो रथस्त्रिचक्रः परि वर्तते रजः ।

महत्तद्वो देव्यस्य प्रवाचनं द्यामृभवः पृथिवीं यच्च पुष्यथ ॥१॥

रथं ये चक्रुः सुवृतं सुचेतसोऽविह्वरन्तं मनसस्परि ध्यया ।

ताँ ऊ न्वस्य सवनस्य पीतय आ वो वाजा ऋभवो वेदयामसि ॥२॥


ह्या वरील सूक्ताचा मराठी भाषेतील अर्थ पाहू :

सर्वप्रथम ह्या अंतराळयानाचे वर्णन केले आहे. घोडे नसलेले (अनश्व ) वाहन (रथ ) असून त्याला तीन चाके (त्रिचक्रः ) आहेत. ह्यावर ताबा मिळविणे कठीण आहे (अनभीशु:). हे वाहन मौखिक (उक्थ्यः ) आज्ञांप्रमाणे चालू शकते. हवेतून उडत असताना हे वाहन जराही इकडे तिकडे हलत नाही, भरकटत नाही (विह्वरन्तम्). हे वाहन अतिशय प्रचंड आकाराचे असते (महत्त) तसेच वर्तुळाकार (सुवृतं ) आहे. 

पुढील ओळीत ह्या ऋभू ऋषींचा गौरव  केला आहे.

अतिशय बुद्धिमान (सुचेतसः) असलेले हे ऋभू तुमचा गौरव आहे. अंतराळात (द्याम् ) संचार करण्यासाठी तुम्ही जे यान तयार केलेले आहे ते नक्कीच कौतुकास्पद  (प्रवाचनम् ) आहे.

पुढील ओळीत हे अंतराळयानाचे वैशिष्ट्य सांगितले आहे 

हे तुम्ही तयार केलेले यान (रथं ये चक्रुः ) मनोवेगाने प्रवास करते (मनसस्परि ध्यया)

आता वरील सर्व अर्थ इंग्रजी भाषेत पाहू :

The vehicle is without horses. It has three wheels. It has no controls. It runs on verbal commands. It is circular and well balanced. It does not tremble while flying. It is very huge.

Of great intellect born, you RIBHU. In space you manufacture the vehicle is glorified. The vehicle which you manufactured, have made it with tremendous power of concentration and its beyond mind.

इथे वेदांच्या टीकाकारांना पुराव्यासह उदाहरण दिले आहे. अशाप्रकारचे यान निश्चित अस्तित्वात असणार त्याशिवाय इतके योग्य वर्णन लिहिणे शक्य नाही शिवाय हे यान मनोवेगाने प्रवास करते म्हणजे मनाद्वारे लहरी प्रक्षेपित करुन यानाचे नियंत्रण करणे  इतके प्रगत तंत्रज्ञान होते त्या काळात. अशाप्रकारे *गोल तबकडीच्या आकाराचे अंतराळयान' अजूनही आधुनिक तंत्रज्ञान विकसित करू शकलेले नाही असे वाटते. परंतु, आपण जर उडत्या तबकड्यांचा  ( UFO : Unidentified Flying Object) विषय पाहिला तर त्यांचा आकार अणि ऋग्वेदात वर्णन केलेला आकार सारखाच आहे. ह्या उडत्या तबकड्यांचा संबंध परग्रहवासींशी लावला जातो. आपल्या वेदांमध्ये एकापेक्षा जास्त ब्रह्मांडे आहेत असा उल्लेख आहे त्यामुळे परग्रहवासी लोक असण्याची शक्यता आहे. 

इथे ऋग्वेदात अंतराळयानाचे वर्णन अतिशय स्पष्ट शब्दांत केले आहे. असे असून सुद्धा अंतराळयानाचे सर्व श्रेय परदेशी वैज्ञानिकांना देऊन आपण मोकळे झालो आणि आपल्या ऋभू देवतांची साधी आठवण सुद्धा आपल्याला राहिली नाही हे आपले दुर्दैव. 

No one person invented the first spacecraft, but rather it was the work of a very large team. The first ship to safely put a man in space and orbit the earth was Vostok 1, piloted by Yuri Gagarin in 1961.

माझी सर्व पालकांना आणि शिक्षकांना विनंती आहे की आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना माझा वरील लेख जरूर दाखवावा आणि वेदकाळी भारतीयांनी विज्ञानात किती प्रगती केली होती ही समजवावे. 

टीप : वरील लेखात आधुनिक पाश्चात्य वैज्ञानिकांना कमी लेखण्याचा प्रयत्न नसून प्राचीन भारतीय विज्ञानाची प्रगती दाखविणे हाच हेतू आहे. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

Monday, 12 December 2022

वेदविज्ञानरंजन - २

 वेदविज्ञानरंजन_२

गुरुत्वाकर्षण सिद्धांत


गुरुत्वाकर्षण सिद्धांत दर्शविणारी ऋग्वेदातील खालील ऋचा पाहू : ऋग्वेद मंडल ८ सूत्र १२ मंत्र २८ 


यदा ते हर्य्यता हरी वावृधाते दिवेदिवे |

आदित्ते विश्वा भुवनानि येमिरे ||


ह्याचा अर्थ खालील प्रमाणे :


जेव्हा (यदा ते ) ते सर्व ग्रह (विश्वा भुवनानि ) कालपरत्वे (दिवेदिवे ) गतिमान होऊन (हर्य्यता हरी ) सूर्याच्या निकट असतात , तेव्हा त्यांच्या गतीत वाढ होते ( वावृधाते ) तेव्हा (आदित्ते ) त्यावेळी ते ग्रह सूर्याकडून आपापल्या कक्षेत आणि स्थानात स्थापन केले जातात. 


ह्यातून खालील चार वैज्ञानिक तत्त्वांचा बोध होतो. 


१. सूर्य आणि ग्रह यांच्या मध्ये गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे. 

There is a gravitational force in between planets and the Sun


२. ग्रहांची कक्षा स्थिर असते 

Planets are moving in an orbit. 


 ३. सूर्य स्थिर असून इतर ग्रह त्याभोवती फिरतात*. 

The Sun is steady and planets are revolving around it


४. ग्रहांची परिभ्रमण गती आणि त्यांचे सूर्यापासूनचे अंतर ह्यांचे प्रमाण व्यस्त असते. 


The motion of planet is such that 

Velocity of planets is in inverse relation with the distance in between the plane and the Sun


वरील सूत्रात गुरुत्वाकर्षण सिद्धांत आणि सूर्य स्थिर असून सर्व ग्रह त्याभोवती फिरतात असे सांगितले आहे. येथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणारे ग्रह ह्यांचे ज्ञान ऋग्वेदकालीन ऋषींना कसे होते? एकतर सूक्ष्म शरीर धारण करून योगबळाने पृथ्वीच्या बाहेर अवकाशात जाऊन त्यांनी हे सर्व पाहिले असावे किंवा त्याकाळी अवकाशयाने अस्तित्वात असणार ज्याच्यामध्ये अवकाशप्रवास करून सर्व निरीक्षणे नोंदवली असण्याची शक्यता आहे. वेदकालीन अवकाशयाने हा माझा एक स्वतंत्र लेख ह्या लेखमालिकेत पुढे येईलच. 


पिप्पलाद ऋषींनी प्रश्नोपनिषद ह्या ग्रंथात गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला आहे. 


 पायूपस्थे अपानम् (प्रश्नोपनिषद ३.४) 

पृथिव्यां या देवता सैषा पुरुषस्यापानमवष्टभ्य (प्रश्नोपनिषद ३.८ ) 

तसेच आद्य शंकराचार्य ह्यांनी प्रश्नोपनिषद यांवर जे शांकरभाष्य लिहिले आहे त्यात ते म्हणतात 

तथा पृथिव्यां अभिमानिनी या देवता सैषा पुरुषस्य अपानवृत्तीं आकृष्य अपकर्षेण अनुग्रहं कुर्वती वर्तते |

अन्यथा हि शरीरं गुरुत्वात् पतेत् सावकाशे वा उद्गच्छेत् |


ह्याचा अर्थ असा की अपान वायूमुळे मलमूत्र शरीरातून बाहेर पडते. पृथ्वी आपल्या आकर्षण शक्तीमुळे सर्वांना धरून ठेवते. नाहीतर सर्व आकाशात उडून जातील. 

 

Earth is having its own force of attraction dute to which objects are being hold on the surface of the earth. Otherwise object will be fly in the sky


वराहमिहीर यांनी आपल्या पंचसिद्धांतिका ग्रंथात गुरुत्वाकर्षण सिद्धांताचा उल्लेख केला आहे. 


पंचमहामूतमयस्तारागण पंजरे महीगोलः|

खेयस्कान्तान्तःस्थो लोह इवावस्थितो वृत्त: ||


ह्याचा मराठी भाषेत अर्थ पुढीलप्रमाणे 


ज्याप्रमाणे दोन लोहचुंबकांमध्ये लोखंड तुकडा ठेवला असता तो अधांतरी राहतो त्याप्रमाणे तारासमूहात पृथ्वीगोल विशिष्ट शक्तीमुळे (गुरुत्वाकर्षण शक्ती ) अधांतरी राहतो वराहमिहीर यांनी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि त्याचबरोबर चुंबकत्वसुद्धा स्पष्ट केले आहे. म्हणजेच त्याकाळी चुंबकत्वाचे (Magnetizum ) सुद्धा ज्ञान अवगत होते. तसेच महीगोलः असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणतच पृथ्वी गोल आहे हेही त्या काळी ज्ञात होते. 


When an iron piece is hold in between two magnets then it it Wil be balanced by the magnetic force by the two magnets. In the same way the earth is balanced by gravitational force in the space


महर्षी पतंजली यांनी त्यांच्या व्याकरणमहाभाष्य ह्या ग्रंथात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आहे. 


 लोष्ठः क्षिप्तो बाहुवेगं गत्वा नैव तिर्यक् गच्छति नोर्ध्वमारोहति | पृथिवीविकारः पृथिवीमेव गच्छति आन्तर्यतः |



जर मातीचे ढेकूळ (लोष्ठः ) (माती असलेला घट्ट तुकडा ) आकाशाच्या दिशेने वर फेकला तर तो तुकडा त्याचा वेग पूर्ण झाल्यावर क्षणभर थांबतो, आणखी वर जात नाही (नोर्ध्वमारोहति ) . ह्याचे कारण असे की पृथ्वीचा विकार (पृथिवीविकारः) (गुरुत्वाकर्षण शक्ती ) मुळे तो तुकडा पुन्हा खाली येऊन पृथ्वीवर पडतो (पृथिवीमेव गच्छति)


When a piece of soil is thrown in the sky then after some time it's velocity decreases. It becomes steady for a while and then falls on earth due to the gravitational force of Earth


महाभारतातील शांतिपर्वात अध्याय क्र. २६१ मध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांचा संवाद आहे त्यातील श्लोक क्रमांक ३ मध्ये भीष्म पितामह म्हणतात :


भूमेः स्थैर्यं गुरुत्वं च काठिन्यं प्रसवात्मता |

गन्धोः भारश्च शक्तिश्च संघातः स्थापना धृतिः ||


ह्याचा अर्थ पुढीलप्रमाणे 

हे युधिष्ठिरा! स्थिरता, गुरुत्वाकर्षण, कठोरता, उत्पादकता, गंध, भार, शक्ती, घट्टपणा , स्थापना हे भूमीचे गुण आहेत.


वरील श्लोकातील भूमीचा दुसरा गुण गुरुत्व म्हणजेच गुरुत्वाकर्षण आहे असे स्वतः भीष्म सांगत आहेत. 


ह्या आधीच्या लेखातील आणि प्रस्तुत लेखातील विविध उदाहरणांचा विचार करता असे लक्षात येते की न्यूटनच्या कितीतरी शतके आधीच वेद, उपनिषदे यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आहे. परंतु त्यांचा कुठेच उल्लेख नाही. सर्व श्रेय मात्र न्यूटनलाच दिले गेले, कारण त्याने गुरुत्वाकर्षणाचे सूत्र मांडले

परंतु गुरुत्वाकर्षणाची मूळ संकल्पना मात्र युरोपीय नसून भारतीयच आहे आणि ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

आपल्या भारत देशाचे, शिक्षण अभ्यासक्रमाचे (मेकॉले प्रणीत शिक्षणपद्धती) हे दुर्दैव आहे की जाणीवपूर्वक वेदांतील विज्ञान नजरेआड केले गेले. माझी शालेय शैक्षणिक विभागाला विनंती आहे की गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे श्रेय न्यूटनला जरी दिले गेले असले तरीही शालेय विज्ञान पुस्तकात वर उल्लेख केलेल्या वेद, उपनिषदे यांतील गुरुत्वाकर्षण सूत्राचा सुद्धा उल्लेख करावा. म्हणजेच आपल्या पूर्वजांचे, वेदांचे ज्ञान किती सखोल होते हे सर्वांना समजेल आणि त्याचा प्रसार होईल. तूर्तास इथेच थांबतो. 

                    🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...