माझा परिचय

Friday, 20 January 2023

वेदविज्ञानरंजन - ४१: महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - १

वेदविज्ञानरंजन - ४१

महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - १

बृहस्पती आणि मनू ह्यांच्यातील संवाद भीष्म पितामह यांनी धर्मराज युधिष्ठिर यांना सांगितला आहे. तो संवाद महर्षी व्यास यांनी महाभारतात लिहून ठेवला आहे आणि त्याचा उल्लेख अध्याय क्रमांक २०३  मध्ये आहे. त्यावरील विवेचन पाहू.
महाभारत शांति पर्व, मोक्षधर्म पर्व अध्याय २०३ मध्ये श्लोक क्र. १५ पासून  श्लोक क्र. २३ पर्यंत चंद्र, सूर्य आणि खगोलीय घटनांचा मन, शरीर आणि आत्म्याशी कसा संबंध आहे हे उत्तम प्रकारे वर्णन केले आहे. त्याचा अर्थ आपण पाहू.

यथा चन्द्रो ह्यमावस्यामलिङ्गत्वान्न दृश्यते |
न च नाशोsस्य भवति तथा विद्धि शरीरिणम् ||१५|
|

अमावास्या तिथीस चंद्र प्रकाशहीन झाल्यामुळे दिसत नाही, परंतु त्याचे अस्तित्व नष्ट होत नाही, चंद्र नाश पावत नाही. त्याचप्रमाणे आत्मा अदृश्य रुपात असला (दिसत नसला) तरी त्याचे अस्तित्व असते. हे मान्य करावेच लागेल.


क्षीणकोशो ह्यमावस्यां चन्द्रमा न प्रकाशते |
तद्वन्मूर्तिविमुक्तोsसौ शरीरी नोपलभ्यते ||१६||


अमावास्या तिथीला चंद्र आपल्या प्रकाश्य स्थानापासून दूर जातो, आकाशात दिसत नाही. त्याचप्रमाणे देहधारी आत्मा शरीरापासून दूर गेल्यावर दृष्टिगोचर होत नाही, डोळ्यांना दिसत नाही.

अमावास्येला चंद्र दिसत नाही परंतु, त्याचे अस्तित्व असते हा खगोलशास्त्रीय सिद्धांत आहे. (अमा - सह, एकत्र आणि वस \ वास - रहाणे ) = अमावास्या.  ह्या तिथीस सूर्य आणि चंद्र यांचे परस्पर सान्निध्य असते त्यामुळे अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही. सूर्याचन्द्रमसोर्यः परः सन्निकर्षः सामावास्या |. सूर्य आणि चंद्राच्या परम सान्निध्याला अमावास्या असे म्हणावे. हा खगोलीय सिद्धांत महाभारतकाळी आपणास ज्ञात होता.

यथाSSकाशान्तरं प्राप्य चन्द्रमा भ्राजते पुनः |
तद्वल्लिङ्गान्तरं प्राप्य शरीरी भ्राजते पुनः ||१७ ||


पुन्हा तोच चंद्रमा दुसरीकडे आकाशात प्रगट होतो आणि पुन्हा प्रकाशित होतो. अशाप्रकारे जीवात्मा दुसरे शरीर धारण करून पुन्हा प्रगट होतो.

ह्यात आत्मा अमर, अविनाशी असून एक देह सोडून दुसर्‍या देहात प्रवेश करतो असे म्हटले अरे. वरकरणी हा तत्त्वज्ञान देणारा श्लोक वाटत असला तरी तयार मोठे खगोलीय सत्य दडलेले आहे. ह्यात असे म्हटले आहे की चंद्रमा दुसर्‍या आकाशात प्रगट होतो.  म्हणजेच जेव्हा भारतात दिवस असतो तेव्हा अमेरीकेत रात्र असते किंवा इतर काही देशांमध्ये रात्रच असते. वास्तविक चंद्र हा मावळत नाही, उगवत नाही तो आहे तिथेच असतो. परंतु, पृथ्वीचा परिवरनामुळे (स्वतःभोवती फिरणे )  आपल्या दिवस, रात्र  आणि इतर खगोलीय घटना दिसतात
तसेच तो दुसर्‍या देशात उगवतो म्हणजे अमेरिकेसारखी पृथ्वीवरील देश, तिथे तो प्रकाशित असो. आता मला सांगा की  महाभारत हे आपल्या भारतात घडले असल्याने भारताच्या विरुद्ध बाजूकडील देशांच्या भौगोलिक परिस्थितीचेसुद्धा ज्ञान महाभारतकाळी होते त्यामुळेच इथे अचूक आणि योग्य वर्णन ऋषींनी केले होते.

जन्म वृद्धिः क्षयश्चास्य पारत्यक्षेणोपलभ्यते |
सा तु चान्द्रमसी वृत्तिर्न तु तस्य शरीरिणः ||१८ ||


आपल्याला चंद्राच्या ज्या विविध कला दिसतात ह्या चंद्रामुळे घडत नाहीत कारण चंद्र हा पूर्णच असतो. चंद्रकोरीपासून पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमा आणि उलट क्रिया म्हणजे अमावास्या ह्या पृथ्वीच्या गतीमुळे प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे जन्म हा शरीराचा होतो. आत्म्याचा नाही. कारण आत्मा अविनाशी आहे, अमर आहे. म्हणूनच मृतात्म्यास श्रद्धांजली असे कधीही म्हणू नये. मृताच्या आत्म्यास किंवा गतात्म्यास श्रद्धांजली असे म्हणावे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.  इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो.


No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...