माझा परिचय

Wednesday 1 March 2023

वेदविज्ञानरंजन - ४७ : श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - २

 

#वेदविज्ञानरंजन_४७

*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*

🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग -  २

आजच्या लेखात आपण *समय यात्रा म्हणजेच time travel* ह्या आधुनिक *वैज्ञानिक सिद्धांताची माहिती* घेणार आहोत. श्रीमद्भागवत ग्रंथातील
स्कंध ९ अध्याय ३ मध्ये खालील श्लोक दिले आहेत. त्याचा आपण अभ्यास करूया.
🚩
तस्य पुत्रशतं जज्ञे ककुद्मि ज्येष्ठमुत्तमम् ।
ककुद्मी रेवतीं कन्यां स्वामादाय विभुं गतः ॥ २९ ॥
🚩
सत्ययुगात *काकुद्मी नावाचा राजा* होता. त्याची *कन्या रेवती अतिशय सुंदर आणि सदाचारसंपन्न* होती. काकुद्मी राजाने तिच्यासाठी *योग्य वरसंशोधन* सुरू केले. परंतु, संपूर्ण पृथ्वीवर कन्या रेवतीसाठी *सुयोग्य वर न मिळाल्याने तो चिंतातुर* झाला.
🚩
कन्यावरं परिप्रष्टुं ब्रह्मलोकमपावृतम् ।
आवर्तमाने गान्धर्वे स्थितोऽलब्धक्षणः क्षणम् ॥ ३० ॥
🚩
आपल्या मुलीचे नशीब लिहिणाऱ्या ब्रह्म देवालाच विचारावे ह्या उद्देशाने *काकुद्मी आपली कन्या रेवती हिच्यासह अतिवेगाने ब्रह्मलोकी गेला* आणि ब्रह्मदेवासमोर उभा राहिला. त्यावेळी ब्रह्मदेवासमोर *गंधर्वांचे गायन चालू असल्याने काकुद्मीला थोडा वेळ तिथे थांबावे लागले.*
🚩
तदन्त आद्यमानम्य स्वाभिप्रायं न्यवेदयत् ।
तच्छ्रुत्वा भगवान् ब्रह्मा प्रहस्य तमुवाच ह ॥ ३१ ॥
🚩
त्यानंतर काकुद्मीने ब्रह्मदेवाला त्याचे येण्याचे प्रयोजन सांगितले आणि *पृथ्वीवरील कोणता वर रेवतीसाठी योग्य आहे?* अशी विचारणा केली.
🚩
अहो राजन् निरुद्धास्ते कालेन हृदि ये कृताः ।
तत्पुत्रपौत्रनप्तॄणां गोत्राणि च न शृण्महे ॥ ३२ ॥
🚩
त्यावेळी ब्रह्मदेव त्याला म्हणाला, हे राजन्! तुझ्या रेवतीसाठी मी ज्या वराला योजले होते तो *वर काळगतीत नष्ट झाला आहे. त्याचा वंश, नातलग आणि गोत्रसुद्धा कालौघात संपले आहे. आता तर सत्तावीस चतुर्युगे संपून द्वापारयुग चालू झाले आहे.*
🚩
कालोऽभियातस्त्रिणवचतुर्युगविकल्पितः ।
तद् गच्छ देवदेवांशो बलदेवो महाबलः ॥ ३३ ॥
🚩
देवादिधेव परमेश्वराचा अंश असलेल्या *बलरामाने आता पृथ्वीवर अवतार* घेतला आहे.
🚩
कन्यारत्‍नमिदं राजन् नररत्‍नाय देहि भोः ।
भुवो भारावताराय भगवान् भूतभावनः ॥ ३४ ॥
🚩
पृथ्वीवरील सज्जनांचा भार हलका करण्यासाठी त्याने अवतार घेतला असून तो *श्रीकृष्णांचा मोठा भाऊ आहे. त्याला तू तुझी कन्या दे.*
🚩
अवतीर्णो निजांशेन पुण्यश्रवणकीर्तनः ।
इत्यादिष्टोऽभिवन्द्याजं नृपः स्वपुरमागतः ।
त्यक्तं पुण्यजनत्रासाद्‍ भ्रातृभिर्दिक्ष्ववस्थितैः ॥ ३५ ॥
🚩
सुतां दत्त्वानवद्याङ्‌गीं बलाय बलशालिने ।
बदर्याख्यं गतो राजा तप्तुं नारायणाश्रमम् ॥ ३६ ॥
🚩
ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन *काकुद्मी रेवतीसह पृथ्वीवर आला तर त्याला सर्वच गोष्टी बदललेल्या दिसल्या आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलो आहोत असे त्याला वाटले.* त्यानंतर त्याने पुष्कळ शोध घेऊन  *बलरामाशी रेवतीचा विवाह लावून दिला*. त्यानंतर तपश्चर्या करण्यासाठी काकुद्मी बद्रिनारायणास निघून गेला.

वरवर पाहता ही एक *अतिरंजित कथा वाटत असली तरी ती एक सत्य घटना आहे* आणि त्यात खूप मोठा वैज्ञानिक सिद्धांत आहे. त्याचे विवेचन आपण पाहू.

*राजा काकुद्मी आणि रेवती दोघेही पृथ्वीवरून दुसऱ्या लोकात म्हणजे ब्रह्मलोकांत* गेले. ह्याचा अर्थ *विमान किंवा अंतराळयान ह्या सारख्या वाहनांत बसून त्यांनी प्रवास केला असणार. रामायण, महाभारत कालखंडात प्रगत विमाने अस्तित्वात होती ह्याचे अनेक लिखित पुरावे आहेत.*  ब्रह्मलोकात म्हणजे एखाद्या ग्रहावर काकुद्मी आणि रेवती *अंतराळ यानात बसून* गेल्याची शक्यता आहे.

H. G. Wells ह्या परदेशी व्यक्तीने The Time Machine नावाची कादंबरी इ. स. १८९५ मध्ये लिहिली होती. *सुमारास आईन्स्टाईन ह्यांनी सुद्धा time travel and theory of relativity असा सिद्धांत मांडला.* त्यांच्या सिद्धांतानुसार *एखाद्या व्यक्तीने जर अतिवेगाने, प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तर तेथे काळ थांबतो.* त्याला time contraction असे म्हणतात. प्रकाशाच्या वेगाने प्रवास करण्यासाठी अतिप्रचंड उर्जेची गरज असते. ह्या त्याच्या सिद्धांताला अनेक *शास्त्रज्ञांनी मान्यता* दिली आणि त्यावर इंग्रजी भाषेत चित्रपट सुद्धा निघाले. आता हा *सिद्धांत आईन्स्टाईन ह्या परदेशी शास्त्रज्ञाने सांगितल्यावर आपण त्याचा उदो उदो केला.* पण हीच गोष्ट *रूपकात्मक पद्धतीने आपल्याच श्रीमद्भागवत ग्रंथात लिहिली आहे हे आपणास माहिती नाही*. काकुद्मी आणि रेवती *दोघांनीही प्रकाशाच्या वेगाने, अतिवेगाने प्रवास केला असणार त्यामुळे त्या दोघांसाठी काळ थांबला.* परंतु, बाकीच्या जगासाठी मात्र काळ पुढे गेला असल्याने *सत्तावीस चतुर्युगांचे चक्र संपले* असे समजते. आधुनिक विज्ञानाने मांडलेल्या अनेक *सिद्धांताचा पाया, त्यांचे मूळ आपल्याच सनातन धर्मातील ग्रंथांत आहे असे आपल्या लक्षात येईल.*

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...