माझा परिचय

Saturday 24 December 2022

वेदविज्ञानरंजन - २८ : न्यूटनचे गतिविषयीचे नियम भाग - १

 वेदविज्ञानरंजन - २८ : न्यूटनचे गतिविषयीचे नियम भाग - १

आजच्या लेखात आपण न्यूटनचे गतिविषयीचे नियम (Newton's law of motion ) पाहणार आहोत. आपल्या सर्वांना शाळेत असताना हे तीन नियम शिकवलेले असतात ते विज्ञानाच्या पुस्तकात. हेच नियम महर्षी कणाद यांनी त्यांच्या वैशेषिक ग्रंथात नमूद केले आहेत. याचे विवेचन आपण पाहू. 

न्यूटनचा पहिला नियम : (Newton's first law of motion ) 

The change of motion is due to impressed force (Principia)

An object at rest will stay at rest and an object in motion will stay in motion unless acted by  the net external force. 

ह्या नियमाचे मराठी भाषांतर पाहू :

एखादी वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहते, गतीमान असेल तर गतिमान राहते. जोपर्यंत तिच्यावर बाह्यबलाचा प्रभाव पडत नाही तोपर्यंत त्या वस्तूच्या गतीत काहीही बदल होत नाही. 

आता महर्षी कणाद यांचे सूत्र पाहू :

वेगः निमित्तविशेषात कर्मणो जायते| 

वस्तूच्या गतीत बदल होण्यासाठी बलाची आवश्यकता असते 

(change of motion is due to impressed force ) 

संयोगविभागवेगानां कर्म समानम् ।  वैशेषिक-१,१.२०

( if two bodies have to collide or move away, the cause of is common which is KARMA - Force ) 

दोन वस्तूंची टक्कर होण्यासाठी किंवा त्या दोन वस्तू एकमेकांपासून दूर जाण्यासाठी बलाची आवश्यकता आहे.

न द्रव्याणाम् कर्म |   वैशेषिक-१. १.२१

The KARMA (Force ) can not come from the bodies. It has to be external 

म्हणजेच दोन वस्तूंवर जे बल प्रयुक्त केले असते ते बाह्यबल असते.. ह्याचा सोपा अर्थ असा की 

(change of motion is due to impressed force) वेग हा कर्म केल्यामुळे म्हणजे बलामुळे (force ) निर्माण होतो. 

येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपले ऋषी हे अत्यंत प्रयोगशील होते. निरनिराळे प्रयोग करून त्याच्यावर खूप संशोधन करून त्यांनी निष्कर्ष मांडले आहेत. महर्षी कणाद ह्यांचा वैशेषिक दर्शन हा एक उत्कृष्ठ वैज्ञानिक ग्रंथ आहे. त्यात विविध वैज्ञानिक सिद्धांत सामावलेले आहेत. आज आपण जे न्यूटनचे गतिविषयीचे नियम वाचतो ते मुळात महर्षी कणाद यांचे आहेत. *महर्षी कणाद यांचा काळ अंदाजे इ. स. पू. ६ वे ते २ रे शतक असा आहे आणि न्यूटन यांचा काळ इ. स. १६४३ ते इ. स.१७२७ असा आहे*. ह्याचा अर्थ न्यूटनच्या आधीच साधारण १००० वर्षे महर्षी कणाद यांनी गतिविषयीचे नियम त्यांच्या ग्रंथात मांडले आहेत आणि त्याचे दस्तऐवजीकरणसुद्धा (Documentation ) केले आहे. हे सर्व समोर दिसत असून सुद्धा सर्व श्रेय महर्षी कणाद यांना देण्याच्या ऐवजी न्यूटन यांना दिले गेले*. वैदिक संस्कृती ही अतिशय प्राचीन संस्कृती असून हिंदू र्म हा वैज्ञानिक धर्म आहे. परंतु, पाश्चिमात्य विद्वानांनी जाणीवपूर्वक भारतीयांचे खच्चीकरण करून आपल्याला मागास ठरवले. आता आपल्याला *स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही आपल्या वैज्ञानिक ऋषींची उपेक्षा का? भौतिकशास्त्र शिकविणाऱ्या भारतातील एकाही संस्थेला दाखल घ्यावी असे वाटले नाही का?* 

माझी भारत सरकारला आणि मराठी विज्ञान परिषद अशा संस्थांना हात जोडून विनंती आहे की ह्यासंदर्भात *योग्य तो पाठपुरावा करून प्राचीन भारतीय ऋषींच्या कार्याला, त्यांच्या वैज्ञानिक शोधांना प्रतिष्ठा मिळवून द्यावी.


पुढच्या लेखात  महर्षी कणाद यांचे अजून काही गतिविषयीचे नियम पाहू. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...