माझा परिचय

Saturday 24 December 2022

वेदविज्ञानरंजन - २९ : न्यूटनचे गतिविषयीचे नियम भाग - २

 वेदविज्ञानरंजन - २९ :  न्यूटनचे गतिविषयीचे नियम भाग - २

आजच्या लेखात आपण न्यूटनचा गतिविषयीचा पहिला नियम (Newton's law of motion ) पाहिला होता. आज आपण अजून दोन नियम पहाणार आहोत. आपल्या सर्वांना शाळेत असताना हे तीन नियम शिकवलेले असतात, ते विज्ञानाच्या पुस्तकात. हेच नियम महर्षी कणाद यांनी त्यांच्या वैशेषिक ग्रंथात नमूद केले आहेत. याचे विवेचन आपण पाहू. 

न्यूटनचा गतिविषयीचा दुसरा नियम

(Newton's second law of motion ) 

The rate of change of motion of the body is directly proportional to the force applied. 

वस्तूच्या गतीत होणारा बदल, वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलाच्या समानुपाती असतो. 

वेगः निमित्तापेक्षात कर्मणो जायते नियतदिक क्रियाप्रबन्धहेतु

(Change of motion is proportional to the motive force impressed and is made in the direction of the right line in which the force is impressed)

एखाद्या वस्तूवर जेव्हढे अधिक बल (force) लावले जाते तेव्हढी त्या वस्तूची गती (velocity ) अधिक वाढते, अधिक त्वरण (acceleration ) निर्माण होते 

प्रयत्नविशेषान्नोदनविशेषः    वैशेषिक ५.१.६ 

Particular efforts results in particular impulse. 

न्यूटनचा गतिविषयीचा तिसरा नियम

Every action has equal and opposite reaction 

कार्यविरोधि कर्मः. वैशेषिक ५.१.६ 

वेगः संयोगविशेषविरोधी 

(Every action there is always an equal and opposite reaction)

The Effect (KARYA ) always opposes the Action (KARMA)

नदीच्या किनाऱ्यावर आपल्याला एखादी होडी पाण्यात ढकलायची असेल तर किनाऱ्यावरील जमिनीच्या दिशेने बल लावावे लागते तेव्हा त्याच्या विरुद्ध दिशेने होडी पाण्यात ढकलली जाते.न्यूटन यांनी सांगितलेले हे तीन नियम आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात कमी अधिक प्रमाणात वापरत असतो.

आज आपण जे न्यूटनचे गतिविषयीचे नियम वाचतो ते मुळात महर्षी कणाद यांचे आहेत. महर्षी कणाद यांचा काळ अंदाजे इ. स. पू. ६ वे ते २ रे शतक असा आहे आणि न्यूटन यांचा काळ इ. स. १६४३ ते इ. स.१७२७ असा आहे. ह्याचा अर्थ न्यूटनच्या आधीच साधारण १००० वर्षे महर्षी कणाद यांनी गतिविषयीचे नियम त्यांच्या ग्रंथात मांडले आहेत आणि त्याचे दस्तऐवजीकरणसुद्धा (Documentation ) केले आहे. हे सर्व समोर दिसत असून सुद्धा सर्व श्रेय महर्षी कणाद यांना देण्याच्या ऐवजी न्यूटन यांना दिले गेले. वैदिक संस्कृती ही अतिशय प्राचीन संस्कृती असून हिंदू धर्म हा वैज्ञानिक धर्म आहे. परंतु, पाश्चिमात्य विद्वानांनी जाणीवपूर्वक भारतीयांचे खच्चीकरण करून आपल्याला मागास ठरवले. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही आपल्या वैज्ञानिक ऋषींची उपेक्षा का? भौतिकशास्त्र शिकविणाऱ्या भारतातील एकाही संस्थेला दाखल घ्यावी असे वाटले नाही का? 

माझी भारत सरकारला आणि मराठी विज्ञान परिषद अशा संस्थांना हात जोडून विनंती आहे की ह्यासंदर्भात योग्य तो पाठपुरावा करून प्राचीन भारतीय ऋषींच्या कार्याला, त्यांच्या वैज्ञानिक शोधांना प्रतिष्ठा मिळवून द्यावी.

खालील चित्रांत महर्षी कणाद यांचे गतिविषयीचे नियम दर्शविले आहेत. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...